शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींना लळा

By admin | Updated: February 16, 2016 23:44 IST

परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासप्रिय अधिकाऱ्यांची पाठराखण करणे अपेक्षित असताना परभणी जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे.

परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासप्रिय अधिकाऱ्यांची पाठराखण करणे अपेक्षित असताना परभणी जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. काही लोकप्रतिनिधींना विकासकामांमध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लळा लागल्याचे पहावयास मिळत आहे़ अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून उखळ पांढरे करून घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न होत असल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ होत आहे़ परिणामी जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे़ मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा विकासामध्ये कोसोदूर राहिला आहे़ परभणीपासूनच निर्माण झालेल्या हिंगोली जिल्ह्याने प्रगती केली असली तरी परभणी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या कचखाऊ व स्वार्थी वृत्तीमुळे जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही़ पक्ष निष्ठा नाही, वैचारिक भूमिकेशी बांधिलकी नाही़ नेहमीच तडजोड, सकाळी एका व्यासपीठावर तर रात्री दुसऱ्याच बैठकीत अशी भूमिका आतापर्यंत जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी घेतल्याने जिल्ह्याचा विकास झाला नाही़ चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात आणि प्रशासकीय कामकाजात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना लळा लावला जातो़ महसूल विभाग असो की, सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद विविध विभागात अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे़ सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेतील अधिकारी चर्चेत आहेत़ मिनी मंत्रालय असलेल्या या विभागात अधिकारीस्तरावर गोंधळ आहे़ रोजगार हमी योजनेच्या कामावरून जिंतूर, सेलू, पूर्णा येथील गटविकास अधिकाऱ्यांना काम करू दिले जात नाही़ सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकून अनियमित कामे करण्यासाठी गळ घातली जाते़ त्यामुळे येथील गटविकास अधिकारी अनेकदा रजेवर गेले आहेत़ दुसरीकडे येथील पदभार मर्जीतील अधिकाऱ्यांना देण्याची खटाटोप लोकप्रतिनिधींकडून केली जाते़ याबाबीला विरोधही कोणी करीत नाही, याबद्दल आश्चर्यच आहे़ वर्ग १ च्या अधिकाऱ्यांचा पदभार थेट वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला देण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला़ परंतु, त्याला आक्षेप कोणी घेतला नाही़ ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक बळ द्यायचे असते ते अधिकारी मूग गिळून गप्प बसले़ परिणामी बेवारस झालेल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी रजेवर जाणे पसंत केले़ जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसताना विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी तरी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे़ परंतु, विभागीयस्तरापर्यंत या बाबतचा आवाज पोहचूनही चकार शब्द या अधिकाऱ्यांनी काढलेला नाही़ त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे़ यातूनच पुन्हा काही स्वार्थी लोकप्रतिनिधी आपला डाव साधत आहेत़ (जिल्हा प्रतिनिधी)