शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

जलव्यवस्थापनमध्ये तेच ते अहवाल

By admin | Updated: June 21, 2017 23:32 IST

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत अधिकाऱ्यांनी पुन्हा जुनेच अहवाल ठेवले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत अधिकाऱ्यांनी पुन्हा जुनेच अहवाल ठेवले. मात्र बैठक संपल्यानंतर ही बाब सदस्यांच्या लक्षात आली. तोपर्यंत बैठक मात्र खेळीमेळीत आटोपलेली होती.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.या बैठकीत वारंवार तीच माहिती दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषत: लघुसिंचन विभागाकडून मार्चपासूनच्या बैठकीत तोच अहवाल ठेवला जात असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. त्यात अनेक कामे प्रगतीत असल्याचे दाखविले जाते. तर ती पूर्ण होण्याचा पत्ता नाही. जलयुक्तच्या कामांचीही प्रगती नाही. संपूर्ण स्वच्छता विभागाने आता १४६ गावे हागणदारीमुक्त झाल्याचे सांगितले असून यंदाच्या उद्दिष्टाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागानेही मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतील १७ गावांचा आराखडा दिला. तर २0१७-१८ च्या आराखड्यात १३ पैकी केवळ २ कामेच मंजूर झाली व ही कामे सुरू झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे लघुसिंचनच्या कामांचा मार्च एण्डचाच अहवाल सादर केला. त्यात अनेक कामे सुरूच नाहीत. तर खर्चही 0 टक्के आहे. गोषवाऱ्यात शिल्लक रक्कम ८ कोटींवर आहे.