शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मागणी होताच ४८ तासांत टँकर पोहोचवा

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे.

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणाहून मागणी आल्यावर तेथे ४८ तासांच्या आत प्रशासनाने टँकर पोहोचवावा. टँकरच्या पुरेशा खेपा होतील याची काळजी घ्यावी, तसेच टँकर भरण्यासाठी लोडशेडिंगमुळे अडचण येत असेल तेथे जनरेटरची व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा शारदा जारवाल, महापौर कला ओझा, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय वाघचौरे, आ. सुभाष झांबड, तसेच विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासह समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. अब्दुल सत्तार यांनी लावली दोन वर्षांनंतर हजेरीपशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दोन वर्षांच्या खंडानंतर डीपीडीसीच्या बैठकीला हजेरी लावली. मे २०१२ मध्ये खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि आ. अब्दुल सत्तार यांच्यात शाद्बिक खडाजंगी झाली होती. या खडाजंगीनंतर अब्दुल सत्तार मध्येच बैठक सोडून निघून गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पालकमंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या डीपीडीसीच्या बैठकीलाही हजेरी लावली नव्हती. कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर आज पुन्हा एकदा ते डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहिले. घाटी रुग्णालयाबाबत मंत्रालयात बैठकघाटी रुग्णालयासाठी राज्य सरकारने १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून लवकरात लवकर कामे करण्यासाठी लवकरच मंत्रालय स्तरावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कॅन्सर हॉस्पिटललाही सरकारकडून ३ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यातून तातडीने कामे केली जातील. कॅन्सर हॉस्पिटलचे इतरही काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाईल, असेही पालकमंत्री थोरात यांनी सांगितले. २९१ कोटींचा आराखडा मान्यजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१३-१४ सालाच्या वार्षिक योजनेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेचा ९९.२२ टक्के निधी खर्च झाला आहे. सन २०१४-१५ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा वार्षिक आराखडा २०५ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेचा आराखडा अनुक्रमे ५७ आणि ८१ कोटी रुपयांचा आहे. या तिन्ही योजनांच्या एकूण २९१ कोटी रुपयांच्या आराखड्यास आजच्या बैठकीत मंजुरी दिल्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.