शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

बी-बियाणांची पूर्तता करा

By admin | Updated: April 16, 2016 23:25 IST

बीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

बैठक : शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनाबीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सीईओ नामदेव ननवरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागेल तेवढे बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करा त्याअनुशंगाने त्याची मागणही करणे गरजेचे आहे. हंगामात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. बी-बियाणे, खतांचा काळाबाजार होणार नाही आणि त्यावर चोख नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात यावीत. त्यामुळे काळाबाजार रोखून कार्यवाही केल्याने शेतकर्यांची गैरसोय होणार नाही.बी-बियाणाची मागणी करून त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वी पिककर्ज उपलब्ध करु न देणे आवश्यक आहे. मजूरांच्या हाताला काम उपलब्ध करु न देण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात यावे यामध्ये शोषखड्डे, पाणंद रस्ता या कामांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला. खरीपासाठी ७० हजार ८९९ क्विंटल बियाणांची मागणी आहे. विविध प्रकारच्या रासायनिक खताची २ लाख ५३ हजार ७९० मे. टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी बँकामार्फत पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)सूचना : सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची हजेरीखरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा पुरवठा करून पीक कर्जाविषयीही योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बी-बियाणे विक्रीमधून दरवर्षी गैरव्यवहार होतात. त्याअनुषंगाने भरारी पथकांच्या संख्येत वाढ करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढणार असून, कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबरच कडधान्यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.