शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

बी-बियाणांची पूर्तता करा

By admin | Updated: April 16, 2016 23:25 IST

बीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

बैठक : शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनाबीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सीईओ नामदेव ननवरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागेल तेवढे बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करा त्याअनुशंगाने त्याची मागणही करणे गरजेचे आहे. हंगामात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. बी-बियाणे, खतांचा काळाबाजार होणार नाही आणि त्यावर चोख नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात यावीत. त्यामुळे काळाबाजार रोखून कार्यवाही केल्याने शेतकर्यांची गैरसोय होणार नाही.बी-बियाणाची मागणी करून त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वी पिककर्ज उपलब्ध करु न देणे आवश्यक आहे. मजूरांच्या हाताला काम उपलब्ध करु न देण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात यावे यामध्ये शोषखड्डे, पाणंद रस्ता या कामांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला. खरीपासाठी ७० हजार ८९९ क्विंटल बियाणांची मागणी आहे. विविध प्रकारच्या रासायनिक खताची २ लाख ५३ हजार ७९० मे. टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी बँकामार्फत पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)सूचना : सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची हजेरीखरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा पुरवठा करून पीक कर्जाविषयीही योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बी-बियाणे विक्रीमधून दरवर्षी गैरव्यवहार होतात. त्याअनुषंगाने भरारी पथकांच्या संख्येत वाढ करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढणार असून, कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबरच कडधान्यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.