शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल परी’ला पडला ‘रिव्हर्स गिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : गोरगरीब, सर्वसामान्यांची प्रवासवाहिनी असलेली ‘लाल परी’ म्हणजेच एस.टी.ची सेवा कोरोना विळख्यात आता कुठे सुरळीत होत होती; ...

औरंगाबाद : गोरगरीब, सर्वसामान्यांची प्रवासवाहिनी असलेली ‘लाल परी’ म्हणजेच एस.टी.ची सेवा कोरोना विळख्यात आता कुठे सुरळीत होत होती; पण गेल्या महिन्याभरात कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचा ‘एस.टी.’ला पुन्हा एकदा फटका बसत आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्नात मोठी घट झाल्याने ‘एस.टी.’ सेवा ‘रिव्हर्स गिअर’मध्ये गेली आहे. अन‌्लाॅकनंतर प्रारंभी ५० टक्के आसन क्षमतेवर एस.टी. बसेस धावत होत्या. त्यानंतर पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने एस.टी. धावू लागली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आधार मिळाला. कोरोनाच्या विळख्यानंतर एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न ४५ लाखांपर्यंत गेले. त्यामुळे ‘एस.टी.’चा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळांवर येत असल्याचे म्हटले जात होते; परंतु फेब्रुवारीत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. परिणामी, अनेकजण प्रवास टाळत आहेत. त्यातून प्रवासी संख्या घटली. ‘एस.टी.’चे उत्पन्न ३१ लाखांपर्यंत घसरले आहेे; तर प्रवासी भारमान ४२ टक्के झाले आहे. म्हणजे अर्धी बसही भरत नसल्याची परिस्थिती आहे.

प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण

प्रवासापूर्वी प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण केले जाते. मास्क असेल तरच प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जातो; त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती

एकूण बसेस - ५५०

एकूण रोजच्या फेऱ्या - ६,२२२

आगार -८

प्रवासी भारमान - ४२ टक्के

रोजचे उत्पन्न-३१ लाख रुपये

----

उत्पन्नात घट, पण सेवा सुरळीत

बसगाड्यांचे भारमान ४२ टक्के झाले आहे. दररोजचे उत्पन्न ४५ लाखांवरून ३१ लाखांपर्यंत घसरले आहे. उत्पन्नात १४ लाखांची घट झाली आहे. तरीही कोणत्याही बसेस बंद करण्यात आलेल्या नाहीत. प्रवासी संख्या पाहून बसेस सोडण्यात येत आहेत.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ