शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव ...

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकास कामे निधी अभावी ठप्प पडली आहेत. कंत्राटदार उर्वरित कामे करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत मनपाच्या पदरी निधी पडलाच नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तरी संत एकनाथ रंगमंदिराचा ‘पडदा’ झाकलेलाच राहणार आहे.

१९९१ मध्ये महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण केले होते. अल्पावधीत नाट्य चळवळीचे हे केंद्र बनले. येथील रंगमंचाने राज्याला अनेक दर्जेदार कलावंत दिले. २०१६ पर्यंत रंगमंदिराची अतिशय बिकट अवस्था झाली. व्यावसायिक नाटक सादर करणाऱ्या कलावंतांना रंगमंचावरील खिळे अक्षरश: टोचत होते. पडदे, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली. शहरातील कलावंतांनी रंगमंदिराच्या या बिकट अवस्थेवर टिकेची झोड उठविली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रंगमंदिर २०१७ मध्ये दुरूस्तीच्या नावावर बंद केले.

रंगमंदिराच्या संपूर्ण दुरूस्तीसाठी अगोदर २ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी हळूहळू ‘सोयी’नुसार अनेक कामांमध्ये वाढ सुचविली. मनपाच्या तिजोरीत पैसा नसताना जवळपास ८ कोटींपर्यंत ही डागडुजी नेण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी सिव्हिल वर्क, वातानुकूलीत यंत्रणा नव्याने बसविणे, खुला रंगमंच नव्याने उभारणे, प्रकाश व्यवस्था आदी अनेक कामांचा समावेश करण्यात आला. ही कामे करण्यास एकही कंत्राटदार तयार नव्हता. या कामांसाठी स्मार्ट सिटीचा निधी वापरण्यात येणार असल्याचे ‘गाजर’कंत्राटदारांना दाखविण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी मोठ्या उत्साहात कोट्यवधी रुपयांची कामे केली. नंतर स्मार्ट सिटीकडून या कामासाठी निधी मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांचे अवसान गळाले. मागील दीड वर्षापासून रंगमंदिराचे उर्वरित ३० टक्के काम रखडले आहे. जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची कंत्राटदारांची बिले थकीत आहेत.

आणखी पाच कोटींची गरज

संत एकनाथ रंगमंदिराचे शंभर टक्के काम करण्यासाठी एकूण ५ कोटी रुपये लागणार आहेत. यापूर्वी शासनाकडून दीड कोटींचा निधी मिळाला होता. उर्वरित रकमेची महापालिका वाट पाहत आहे. रक्कम प्राप्त होताच कंत्राटदारांकडून उर्वरित कामे करून घेणे शक्य होईल.

सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा.