शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव ...

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकास कामे निधी अभावी ठप्प पडली आहेत. कंत्राटदार उर्वरित कामे करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत मनपाच्या पदरी निधी पडलाच नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तरी संत एकनाथ रंगमंदिराचा ‘पडदा’ झाकलेलाच राहणार आहे.

१९९१ मध्ये महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण केले होते. अल्पावधीत नाट्य चळवळीचे हे केंद्र बनले. येथील रंगमंचाने राज्याला अनेक दर्जेदार कलावंत दिले. २०१६ पर्यंत रंगमंदिराची अतिशय बिकट अवस्था झाली. व्यावसायिक नाटक सादर करणाऱ्या कलावंतांना रंगमंचावरील खिळे अक्षरश: टोचत होते. पडदे, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली. शहरातील कलावंतांनी रंगमंदिराच्या या बिकट अवस्थेवर टिकेची झोड उठविली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रंगमंदिर २०१७ मध्ये दुरूस्तीच्या नावावर बंद केले.

रंगमंदिराच्या संपूर्ण दुरूस्तीसाठी अगोदर २ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी हळूहळू ‘सोयी’नुसार अनेक कामांमध्ये वाढ सुचविली. मनपाच्या तिजोरीत पैसा नसताना जवळपास ८ कोटींपर्यंत ही डागडुजी नेण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी सिव्हिल वर्क, वातानुकूलीत यंत्रणा नव्याने बसविणे, खुला रंगमंच नव्याने उभारणे, प्रकाश व्यवस्था आदी अनेक कामांचा समावेश करण्यात आला. ही कामे करण्यास एकही कंत्राटदार तयार नव्हता. या कामांसाठी स्मार्ट सिटीचा निधी वापरण्यात येणार असल्याचे ‘गाजर’कंत्राटदारांना दाखविण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी मोठ्या उत्साहात कोट्यवधी रुपयांची कामे केली. नंतर स्मार्ट सिटीकडून या कामासाठी निधी मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांचे अवसान गळाले. मागील दीड वर्षापासून रंगमंदिराचे उर्वरित ३० टक्के काम रखडले आहे. जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची कंत्राटदारांची बिले थकीत आहेत.

आणखी पाच कोटींची गरज

संत एकनाथ रंगमंदिराचे शंभर टक्के काम करण्यासाठी एकूण ५ कोटी रुपये लागणार आहेत. यापूर्वी शासनाकडून दीड कोटींचा निधी मिळाला होता. उर्वरित रकमेची महापालिका वाट पाहत आहे. रक्कम प्राप्त होताच कंत्राटदारांकडून उर्वरित कामे करून घेणे शक्य होईल.

सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा.