शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव ...

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकास कामे निधी अभावी ठप्प पडली आहेत. कंत्राटदार उर्वरित कामे करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत मनपाच्या पदरी निधी पडलाच नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तरी संत एकनाथ रंगमंदिराचा ‘पडदा’ झाकलेलाच राहणार आहे.

१९९१ मध्ये महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण केले होते. अल्पावधीत नाट्य चळवळीचे हे केंद्र बनले. येथील रंगमंचाने राज्याला अनेक दर्जेदार कलावंत दिले. २०१६ पर्यंत रंगमंदिराची अतिशय बिकट अवस्था झाली. व्यावसायिक नाटक सादर करणाऱ्या कलावंतांना रंगमंचावरील खिळे अक्षरश: टोचत होते. पडदे, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली. शहरातील कलावंतांनी रंगमंदिराच्या या बिकट अवस्थेवर टिकेची झोड उठविली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रंगमंदिर २०१७ मध्ये दुरूस्तीच्या नावावर बंद केले.

रंगमंदिराच्या संपूर्ण दुरूस्तीसाठी अगोदर २ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी हळूहळू ‘सोयी’नुसार अनेक कामांमध्ये वाढ सुचविली. मनपाच्या तिजोरीत पैसा नसताना जवळपास ८ कोटींपर्यंत ही डागडुजी नेण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी सिव्हिल वर्क, वातानुकूलीत यंत्रणा नव्याने बसविणे, खुला रंगमंच नव्याने उभारणे, प्रकाश व्यवस्था आदी अनेक कामांचा समावेश करण्यात आला. ही कामे करण्यास एकही कंत्राटदार तयार नव्हता. या कामांसाठी स्मार्ट सिटीचा निधी वापरण्यात येणार असल्याचे ‘गाजर’कंत्राटदारांना दाखविण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी मोठ्या उत्साहात कोट्यवधी रुपयांची कामे केली. नंतर स्मार्ट सिटीकडून या कामासाठी निधी मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांचे अवसान गळाले. मागील दीड वर्षापासून रंगमंदिराचे उर्वरित ३० टक्के काम रखडले आहे. जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची कंत्राटदारांची बिले थकीत आहेत.

आणखी पाच कोटींची गरज

संत एकनाथ रंगमंदिराचे शंभर टक्के काम करण्यासाठी एकूण ५ कोटी रुपये लागणार आहेत. यापूर्वी शासनाकडून दीड कोटींचा निधी मिळाला होता. उर्वरित रकमेची महापालिका वाट पाहत आहे. रक्कम प्राप्त होताच कंत्राटदारांकडून उर्वरित कामे करून घेणे शक्य होईल.

सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा.