शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

फेरपंचनाम्यात नुकसानीचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST

औरंगाबाद : तलाठ्यांकडून चुकीचे पंचनामे झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात फेरपंचनाम्यांचे आदेश देण्यात आले होते.

औरंगाबाद : तलाठ्यांकडून चुकीचे पंचनामे झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात फेरपंचनाम्यांचे आदेश देण्यात आले होते. आता हे फेरपंचनामे पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. या वाढीव क्षेत्राला मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे ३ कोटी रुपयांची जास्तीची मागणी केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये लाखो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले होते. जिल्ह्यात तलाठ्यांमार्फत पंचनामे झाले. त्यानंतर सरकारकडून पॅकेजही जाहीर झाले. शासनाने हेक्टरी कोरडवाहूसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार आणि फळपिकांसाठी २५ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत मंजूर केली. त्यानुसार जिल्ह्याला १०८ कोटी रुपयांची मदत मिळाली. ही रक्कम जिल्हा प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच मिळाली. तिचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, सुरुवातीपासून जिल्ह्यात तलाठ्यांकडून योग्य पंचनामे झाले नसल्याचा आरोप होत होता. अनेक ठिकाणी तलाठ्यांनी घरी बसूनच पंचनामे केल्याच्या असंख्य तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने काही भागांमध्ये फेरपंचनाम्यांचे आदेश दिले होते. हे फेरपंचनामे पूर्ण झाले आहेत. या नवीन पंचनाम्यांमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गंगापूर, औरंगाबाद आणि सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये हे क्षेत्र वाढले असून त्याला मदत देण्यासाठी आणखी ३ कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता राज्य सरकारकडे ३ कोटी रुपयांची वाढीव मदत देण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. गंगापूर तालुक्याला हवेत १.५ कोटीफेरपंचनाम्यातील वाढीव क्षेत्राला मदत करण्यासाठी गंगापूर तालुक्यात सर्वाधिक दीड कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद तालुक्यात १ कोटी रुपये, तर सोयगाव तालुक्यात ५० लाख रुपयांची गरज भासणार आहे.