शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पावसासाठी अल्लाहकडे साकडे

By admin | Updated: July 19, 2015 00:59 IST

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांनी पाऊस पडावा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात़ देशाची व लातूर शहराची शांतता कायम राहवी, यासाठी दुवा मागितली़ सकाळी ९़३० ते १० वाजेपर्यंत बयान झाले़ त्यानंतर समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ वाहतुकीला अडथळा येवू नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदलही केला होता़ आ़ अमित देशमुख यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण केले़ यावेळी बयान करताना मौलाना इस्माईल कास्मी म्हणाले, जकात देणे ही चांगली बाब आहे़ प्रत्येकाने आपापल्या परीने जकात दिली पाहिजे, प्रत्येकाची ती बांधिलकी आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ त्यामुळे तो आत्महत्या करीत आहे़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल़ देशात शांतता नांदावी, अशी प्रार्थना मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी ईदगाह मैदानावर आ़विक्रम काळे, माजी आ़ वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात, तहसीलदार संजय वारकड, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, राजा मणियार, अ‍ॅड़ समद पटेल, अ‍ॅड़ आण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, शैलेश लाहोटी, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, मोईज शेख, चाँदपाशा घावटी, मोहन माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता़ नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकाने पाऊस पडावा म्हणून दुवा मागितली़ बार्शी रस्त्यावर दयानंद महाविद्यालयासमोर ईदगाह मैदान असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती़ सकाळी ८ वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक समांतर रस्त्यावरुन वळविण्यात आली होती़ ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली़ रमजान ईद या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरु होते़ त्याचबरोबर गुलगुले, शिरखुर्मा, भजे, शंकरपाळे, चिवडा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद उत्साहात साजरी झाली़ नातेवाईक व इष्टमित्रांनीही या गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला़ गळाभेट घेऊन ईदच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात होत्या़ शिवाय ईदगाह मैदानाच्या मुख्य रस्त्यावर शुभेच्छांचे फलकही लागले होते़ देशाचे वातावरण पोषक राहण्यासाठी सर्वांनी भाईचारा जपायला हवा़ त्यातूनच सर्व लोकांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली़ पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ पावसाअभावी शेतकरी संकटात आहेत़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल, पाऊसही पडेल, अशी प्रार्थना यावेळी मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी हजारो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव प्रार्थनास्थळी उपस्थित होते़