शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

पावसासाठी अल्लाहकडे साकडे

By admin | Updated: July 19, 2015 00:59 IST

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांनी पाऊस पडावा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात़ देशाची व लातूर शहराची शांतता कायम राहवी, यासाठी दुवा मागितली़ सकाळी ९़३० ते १० वाजेपर्यंत बयान झाले़ त्यानंतर समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ वाहतुकीला अडथळा येवू नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदलही केला होता़ आ़ अमित देशमुख यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण केले़ यावेळी बयान करताना मौलाना इस्माईल कास्मी म्हणाले, जकात देणे ही चांगली बाब आहे़ प्रत्येकाने आपापल्या परीने जकात दिली पाहिजे, प्रत्येकाची ती बांधिलकी आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ त्यामुळे तो आत्महत्या करीत आहे़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल़ देशात शांतता नांदावी, अशी प्रार्थना मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी ईदगाह मैदानावर आ़विक्रम काळे, माजी आ़ वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात, तहसीलदार संजय वारकड, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, राजा मणियार, अ‍ॅड़ समद पटेल, अ‍ॅड़ आण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, शैलेश लाहोटी, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, मोईज शेख, चाँदपाशा घावटी, मोहन माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता़ नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकाने पाऊस पडावा म्हणून दुवा मागितली़ बार्शी रस्त्यावर दयानंद महाविद्यालयासमोर ईदगाह मैदान असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती़ सकाळी ८ वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक समांतर रस्त्यावरुन वळविण्यात आली होती़ ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली़ रमजान ईद या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरु होते़ त्याचबरोबर गुलगुले, शिरखुर्मा, भजे, शंकरपाळे, चिवडा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद उत्साहात साजरी झाली़ नातेवाईक व इष्टमित्रांनीही या गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला़ गळाभेट घेऊन ईदच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात होत्या़ शिवाय ईदगाह मैदानाच्या मुख्य रस्त्यावर शुभेच्छांचे फलकही लागले होते़ देशाचे वातावरण पोषक राहण्यासाठी सर्वांनी भाईचारा जपायला हवा़ त्यातूनच सर्व लोकांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली़ पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ पावसाअभावी शेतकरी संकटात आहेत़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल, पाऊसही पडेल, अशी प्रार्थना यावेळी मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी हजारो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव प्रार्थनास्थळी उपस्थित होते़