शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

योगशास्त्राच्या मूळ तत्वालाच हरताळ..!

By admin | Updated: July 21, 2016 01:10 IST

कळंब : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानूसार शाळामध्ये आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला 'योग डे ' साजरा केला जाणार आहे.

कळंब : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानूसार शाळामध्ये आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला 'योग डे ' साजरा केला जाणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचीत सूचना न दिल्याने गुरूवारी जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळात नियमित वेळात म्हणजे सकाळी दहा वाजता परिपाठाच्या तासिकेत योगाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ‘उपाशीपोटी योगा’ या योगशास्त्राच्या मूळ तत्वालाच हारताळ फासला जाणार असल्याचे बोलले जाते.भारतीय योगविद्येस जगात मानाचे स्थान आहे. यामुळेच सयूंक्त राष्ट्र संघाने व्यक्तिच्या शारिरीक व आत्मिक विकासात महत्व असलेल्या योगाचा प्रचार व्हावा यासाठी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केला. यानंतर ८ जून २०१६ रोजी राज्याचे शिक्षण विभागाने केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेचा संदर्भ एक शासन निर्णय देवून राज्यातील सर्व शाळामध्ये प्रत्येक महिन्यातील २१ तारीख ही ‘योग दिवस ’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठण करण्याच्याही सूचना या आदेशात दिल्या होत्या.योगाचा प्रसार अधिक व्यापक व्हावा व याचा विद्यार्थ्यांच्या शारिरीक व आत्मिक विकासात फायदा व्हावा हा उदात्त हेतू यामागे आहे.गत महिन्यात सर्व शाळात सकाळच्या प्रहरी पहिला योग दिवस साजरा करण्यात आला. परंतु दूसरा योग दिवस गुरूवारी आहे. यावेळी जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात २१ जुलैला परिपाठाच्या तासात योग दिवस साजरा करावा अशा सूचना दिल्या आहेत. वस्तुत: याच आदेशात शाळेच्या नियमित वेळेत बदल करायचा की नाही याचा उल्लेख करणे आवश्यक होते. परंतु यासंबंधी कसलाही उल्लेख नसल्याने जिल्हा परिषदेसह बहुतांश खाजगी शाळाही सकाळी १० च्या दरम्यान नियमित वेळेनुसार भरणार आहेत. (वार्ताहर) योग करावयाचा असेल तर तो सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. तसे केले तरच त्याचे शरिराला चांगले फायदे मिळू शकतात. त्यानंतर केले तर नुकसान होत नसले तरी त्याचा फार लाभही मिळणार नाही. खरे म्हणजे, जेवनानंतर किंवा काही खाल्ले असेल तर कुठलेही आसन करू नये, प्राणायामही करू नये असे शास्त्र सांगते. -शशीकुमार भातलवंडे, योग प्रशिक्षक, कळंब.खाऊन पिऊन योगाचे धडे४योगशास्त्रानुसार शक्यतो योगाचे धडे हे उपाशीपोटी घ्यावयास पाहिजेत. तरच त्याचा उचीत परिणाम होत असतो.परंतु गुरूवारी शाळांतून दिला जाणारा योगाभ्यास हा उपाशीपोटी ऐवजी भरल्यापोटीच केला जाणार असल्याचे दिसून येत आहे. यातही अनेक शाळांत योगाचे प्रशिक्षण असलेले प्रशिक्षक योग साधक नाहीत. त्यामुळे योगाचा प्रसार केवळ प्रतिकात्मक ठरू नये, यासाठी प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस आयोजित करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न म्हणजे एक औपचारीकता तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.