शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By admin | Updated: September 11, 2014 01:21 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत. डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण प्रत्येक गल्लीबोळात दिसत असल्याने शहरातील सर्व खाजगी रुग्णालये आणि आयसीयू डेंग्यूच्या रुग्णांनी फुल झाले आहेत. घाटी रुग्णालयातही दाखल होणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. तीन महिन्यांत घाटीत दाखल झालेल्या ५४७ रुग्णांपैैकी १४८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मगरे यांनी सांगितले की, डेंग्यूसदृश रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मे महिन्यात ६३ डेंग्यूसदृश रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले होते. जूनमध्ये ५८ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. त्यापैकी १८ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट १०५पर्यंत वाढली. या रुग्णांची रक्ततपासणी केली असता ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर आॅगस्टमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे २५४ रुग्ण घाटीत दाखल झाले. यापैकी ९१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने महानगरपालिका आणि ग्रामीण आरोग्य विभाग यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे यावरून पुन्हा सिद्ध होते.थंडी-ताप आल्यानंतर रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे. त्याच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मगरे यांनी दिला.