शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By admin | Updated: September 11, 2014 01:21 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत. डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण प्रत्येक गल्लीबोळात दिसत असल्याने शहरातील सर्व खाजगी रुग्णालये आणि आयसीयू डेंग्यूच्या रुग्णांनी फुल झाले आहेत. घाटी रुग्णालयातही दाखल होणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. तीन महिन्यांत घाटीत दाखल झालेल्या ५४७ रुग्णांपैैकी १४८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मगरे यांनी सांगितले की, डेंग्यूसदृश रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मे महिन्यात ६३ डेंग्यूसदृश रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले होते. जूनमध्ये ५८ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. त्यापैकी १८ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट १०५पर्यंत वाढली. या रुग्णांची रक्ततपासणी केली असता ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर आॅगस्टमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे २५४ रुग्ण घाटीत दाखल झाले. यापैकी ९१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने महानगरपालिका आणि ग्रामीण आरोग्य विभाग यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे यावरून पुन्हा सिद्ध होते.थंडी-ताप आल्यानंतर रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे. त्याच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मगरे यांनी दिला.