शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कारखान्यात रोजगारासाठी रांगा

By admin | Updated: July 6, 2014 00:36 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद खरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत.

साहेबराव हिवराळे , औरंगाबादखरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत. दहावी, बारावी, पदवीधरांनी औद्योगिक क्षेत्र, मॉल, कॉल सेंटरवर रोजगाराचा शोध सुरू केला आहे; परंतु पाणीटंचाई, वाळू, खडीचे भाव भडकल्यामुळे बांधकामे बंद आहेत. पर्यायाने मजूर बेरोजगार झाला आहे.गेल्या महिन्यात मजुरांची टंचाई होती. जूनअखेर हंगामी मजूर कुटुंबियांसह शहरात आल्यामुळे कामगार नाक्यावर मजुरांची गर्दी वाढली आहे. मजुरांचा पुरवठा जास्त झाला आणि कामे कमी झाली आहेत. आठ-आठ दिवस काम किंवा रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांची व कुटुंबियांची उपासमार होत आहे. औरंगाबादेत मजुरांची टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतील मजूर पुन्हा परतले आहेत. त्यांना एक महिन्यापासून काम नाही. तेही आता दुष्काळी जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे बांधकामासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पैसे का गुंतवावेत, असा विचार अनेकांनी केला आहे. गेल्या महिन्यात मजूर मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांत खूप स्पर्धा होती. ग्रामीण भागात वाहने पाठवून मजुरांची ने-आण केली जायची. आता नाक्यावर मजुरांची टंचाई नाही. नुकतीच पदवी मिळविलेले विद्यार्थी आवडीनुसार नोकरीच्या शोधात दिसतात.खेड्यात, शेतावर राबण्यापेक्षा मॉल किंवा मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरवर कामासाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी दिसत आहे. गर्दीत कुशल कामगार नाहीतऔरंगाबाद शहरात व औद्योगिक क्षेत्रातील नाक्यावर खेड्यातील मजूर येत असून, हंगामी मजूर मिळत असले तरी कुशल कामगारांची कमतरताच जाणवते. नवीन औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधीतून कुशल कामगारांची आजही गरज आहे, असे मासिआचे संपर्क अधिकारी फुलचंद जैन यांनी सांगितले. साहित्य महागलेबांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अनेकांनी बांधकामे थांबविली असून, खेड्यातील मजूर शहरात आले असले तरी त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पाऊस असल्यास दुष्काळसदृश स्थिती पालटेल अशी अपेक्षा आहे, असे भगवान गायकवाड यांनी सांगितले.हाताला काम मिळालेच पाहिजेऔद्योगिक क्षेत्रात बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे. कारण त्यांच्यावर शिक्षणासह कुटुंबियांचीही जबाबदारी असते. अकुशल कामगारांना कुशलतेकडे नेण्याचे कामही घेतले जावे, अशी मागणी कामगार नेते अनिल जाभाडे, किशोर जाधव यांनी केली.