शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

सीसीआयच्या केंद्रांवर रांगा

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद व्यापाऱ्यांकडून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादव्यापाऱ्यांकडून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. हमीभावावर कापूस विकण्यासाठी सीसीआयच्या केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आतापर्यंत मराठवाड्यातील २२ केंद्रांवर तब्बल १२ लाख २३ हजार क्विंटलची कापूस खरेदी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १३ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात यंदा कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. तरीही कपाशीला म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्यामुळे कपाशीचे भावही घसरले आहेत. बाजारपेठेत सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपेक्षाही कमी भावात कापूस खरेदी सुरू आहे.गतवर्षी हाच भाव पाच हजार रुपये होता. सरकारने कापसाला यंदा प्रतिक्विंटल ४०५० रुपये इतका हमीभाव दिला आहे. बाजारात याहीपेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे यंदा सीसीआयच्या केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. हमीभावावर कापूस विकण्यासाठी याठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत.सीसीआयने यंदा मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या सहा जिल्ह्यांत २२ खरेदी केंदे्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर चालू वर्षी आतापर्यंत ४९३ कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर कापूस या केंद्रांवर येत आहे. सीसीआयच्या वतीने कापसाला यंदा तीन भाव जाहीर करण्यात आले आहेत. चांगल्या दर्जाच्या कापसाला प्रतिक्ंिवटल ४०५० रुपये, मध्यम दर्जाच्या कापसाला ३९५० रुपये आणि कमी दर्जाच्या कापसाला ३८५० रुपये प्रतिक्ंिवटल असे भाव आहेत. मराठवाड्यात सुरुवातीला पहिल्या वेचणीच्या कापसासाठी ४०५० रुपये भाव देण्यात आला. सध्या मध्यम दर्जाचा कापूस येत असल्यामुळे ३९५० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. पुढच्या टप्प्यात शेवटच्या वेचणीचा कापूस विक्रीसाठी येणार आहे. मराठवाडा, खान्देशात सव्वासातशे कोटींची खरेदीसीसीआयच्या औरंगाबादेतील विभागीय महाप्रबंधक कार्यालयांतर्गत मराठवाडा आणि खान्देश विभाग येतो. या दोन्ही विभागांत सीसीआयची एकूण ३५ केंद्रे सुरू आहेत. वरील सर्व केंंद्रांवर आतापर्यंत ७२५ कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली आहे. सर्व ३५ केंद्रांवर एकूण १७ लाख ९६ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असल्याचे महाप्रबंधक एस. के. पाणिग्रही यांनी सांगितले.