शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केरळ रद्दनंतर राजस्थान दौऱ्याच्या हालचाली

By admin | Updated: July 14, 2016 01:04 IST

हणमंत गायकवाड , लातूर ऐन दुष्काळात केरळ सहलीचे नियोजन केल्याने मनपातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्करावा लागला होेता़ विविध संघटनांकडून

हणमंत गायकवाड , लातूरऐन दुष्काळात केरळ सहलीचे नियोजन केल्याने मनपातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्करावा लागला होेता़ विविध संघटनांकडून तसेच माध्यमांतून अभ्यास दौऱ्यावर टिकेची झोडही उठली होती़ परिणामी, नगरसेवकांनी बॅकफूटवर येत हा अभ्यास दौरा रद्द केला होता़ आता दुष्काळातून सावरतो न् सावरतोच पुन्हा अभ्यास सहलीचे वेध नगरसेवकांना लागले आहेत़ राजस्थानच्या माऊंट अबूवरील हिल स्टेशन पाहण्याचा मोह नगरसेवकांना झाला आहे़ नगरसेवकांनी स्थळ निश्चित केले असले तरी दौऱ्याची तारीख अद्यापि निश्चित केली नाही़ टिका होऊ नये म्हणून दौऱ्याविषयी गुप्तता बाळगली जात असून, सावधपणे पावले उचलली जात आहेत़गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नगरसेवकांच्या केरळ अभ्यास दौऱ्याचा बेत आखला होता़ मनपाच्या सभागृहात अधिकृत बैठक घेऊन दौरा ठरला होता़ मात्र दुष्काळ आडवा आला़ दुष्काळात नगरसेवक सहलीवर जात असल्याचे वृत्त शहरात पसरले आणि टिकेची झोड सुरू झाली़ माध्यमांतूनही दौऱ्यावर लाखोंचा खर्च होणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते़ त्यामुळे नगरसेवकांनी नाराज होऊन दौरा रद्द केला़ आता गेल्या पंधरा दिवसांपासून राजस्थान दौऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ गत उन्हाळ्यापासून लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे़ पावसाळयाचा एक महिना उलटूनही टँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे़ पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे़ अशा परिस्थितीत नगरसेवकांना आता अभ्यास दौऱ्याचे स्वप्न पडू लागले आहेत़ कसल्याही परिस्थितीत दौरा रद्द होऊ नये, यासाठी खलबते सुरू आहेत़ सध्या ७२ नगरसेवक असलेल्या लातूर मनपातून एकही नगरसेवक उघडपणे दौऱ्याविषयी बोलत नाही़ नियोजित अभ्यास दौऱ्यासाठी साधारणपणे २० लाखांच्या आसपास खर्च होणार आहे़ मनपाची आर्थिक स्थिती अजुनही नाजूक आहे़ नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, कचरा उचलला जात नाही, त्याचबरोबर कचरा डेपोचाही प्रश्न आहे़ या सर्व प्रश्नावर वेगवेगळी मते मांडून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचे या अभ्यास दौऱ्यासाठी मात्र एकमत झाले आहे़ दौऱ्याविषयीची कार्यक्रम पत्रिका ठरली आहे़ परंतू, ती टीका होऊ नये म्हणून जाहीर केली नाही़ बदली झालेले आयुक्त गेल्या चार दिवसांपासून रजेवर आहेत़ ते आल्यानंतर अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित होणार असल्याचे समजते़ पूर्वी एकदा जाहीर झालेला अभ्यास दौरा टंचाईमुळे रद्द करण्यात आला होता़ सध्याही लातूर शहरात पाणीटंचाई आहे़ त्यामुळे अभ्यास दौऱ्याचे नियोजन नाही़ वास्तविक पाहता अभ्यास दौरे झाले पाहिजेत़ अन्य शहरातील नाविण्यपूर्ण योजना पाहून त्याची कृती आपल्याकडे होईल का? यासाठी अभ्यास सहल असते़ ती झाली पाहिजे़ परंतू, सध्या आपली स्थिती बिकट आहे़ मोठा पाऊस पडल्याशिवाय नियोजन केले जाणार नाही, असे काँग्रेसचे मनपा सभागृहातील गटनेते रविशंकर जाधव यांनी सांगितले़