शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

समान शिक्षणासाठी चळवळ उभारा

By admin | Updated: August 24, 2016 00:48 IST

औरंगाबाद : अलीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा आणि गरिबांच्या मुलांसाठी वेगळ्या. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विषमता वाढत आहे.

औरंगाबाद : अलीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा आणि गरिबांच्या मुलांसाठी वेगळ्या. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विषमता वाढत आहे. सर्वांना के.जी. ते पी.जी.पर्यंतचे शिक्षण मोफत, समान व गुणवत्तापूर्ण मिळालेच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ उभारावी लागेल, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आज येथे व्यक्त केले. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने आयोजित मराठवाडा शिक्षण हक्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेचे उद्घाटन समाजवादी नेते तथा अ.भा. समाजवादी अध्यापक सभेचे संस्थापक अध्यक्ष भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. शरद जावडेकर, डॉ. एच.एम. देसरडा, माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे, विशाखा खैरे, विजय शिंदे, अ‍ॅड. बी.एच. गायकवाड तसेच दत्ताभाऊ पाथ्रीकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. दिनकर बोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शिक्षण हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे अजमल खान यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी भाई वैद्य म्हणाले की, आतापर्यंतच्या आजी-माजी सरकारांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. महासत्तेकडे वाटचाल करताना केवळ शस्त्र खरेदीसाठी सर्वाधिक तरतूद करून चालणार नाही. एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या (जीडीपी) सर्वाधिक तरतूद ही शिक्षण आणि आरोग्यांवर जो देश करतो. तो देश महासत्ता म्हणून उदयास येतो. याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. आपल्या देशात शिक्षण ही खरेदी-विक्रीची वस्तू झाली आहे. शेती, शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे आहेत. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शिक्षणातून बहुजन, अल्पसंख्याक, गरीब, वंचितांना हाकलले जात आहे, या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या देशात श्रीमंतांसाठी वातानुकूलित शाळा,तर गरिबांसाठी कोंडवाड्यासारख्या शाळा आहेत. जिथे गुणवत्ता तर नाहीच; पण त्यालाही अवाच्या सवा शुल्क भरावे लागत आहे. देशात ३३ टक्के दारिद्र्यरेषेखालील नागरिक आहेत. तुटपुंज्या मजुरीत ते दिवसभर राबतात. अशा अवस्थेत आपल्या मुलांना ते उच्च शिक्षण कसे देऊ शकतील. त्यासाठी सर्व शिक्षणात समानता हवी. यासाठी लोकचळवळ उभारावी लागेल. या चळवळीत आपण सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.