शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पावसाने शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:03 IST

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक रेल्वे मुंबईला न जाता ...

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक रेल्वे मुंबईला न जाता अर्ध्या प्रवासातूनच परतल्या. पण त्या दिवशी मुंबईत ‘यूपीएससी’सह ३ परीक्षा होत्या.

रेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या करिअरवरच पावसाचे पाणी फेरले गेले. मुंबईत १८ जुलै रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरूची महात्मा गांधी नॅशनल फेलोशिप, फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाची मॅनेजर पदांसाठी आणि ‘यूपीएससी’ची इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा पार पडली. त्या दिवशी पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नगरसोल, नाशिक, मनमाड, लासलगाव, इगतपुरी येथे रोखण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामध्ये या तिन्ही परीक्षा देण्यासाठी जाणारे परीक्षार्थीही होते. अनेक रेल्वे मुंबईला पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे आयआयएम बंगळुरूची एमजीएनएफ, यूपीएससीची ‘ईएसई’ आणि ‘एफसीआय’चे परीक्षार्थी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे उमेदवारांना परीक्षेविना राहावे लागले.

शासनाने न्याय द्यावा

देवगिरी एक्स्प्रेस लासलगाव येथूनच माघारी परतली. या रेल्वेत माझ्यासह ३५ परीक्षार्थी होते. मुंबईतील विशेषत: केंद्राच्या परिसरात राहणाऱ्यांनाच परीक्षा देता आली. वर्षानुवर्षे अभ्यास केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. शासनाने भवितव्याशी न खेळता एक संधी देऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.

- विशाल बंसवाल, परीक्षार्थी

--------

पुन्हा संधी मिळावी

नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा देण्यापासून वंचित राहिलो. यात आम्हां विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही. जर परीक्षेचे केंद्र पूर्ण राज्यभर असते, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार केंद्राची निवड केली असती आणि आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास झाला नसता. संबंधित विभागाने अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी.

- तुकाराम राजारूपे, एफसीआय परीक्षार्थी