शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पावसाने वीज पुरवठा बंद

By admin | Updated: June 22, 2014 00:24 IST

पालम : तालुक्यात पाऊस पडताच विद्युत पुरवठा बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अर्धा तालुका अंधारात आहे. त्यामुळे तालुकावासियांची गैरसोय होत आहे.

पालम : तालुक्यात पाऊस पडताच विद्युत पुरवठा बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अर्धा तालुका अंधारात आहे. त्यामुळे तालुकावासियांची गैरसोय होत आहे. पालम येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे. आतापर्यंत तांत्रिक बिघाडाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांवर पाऊस पडताच अंधारात राहण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागात विद्युतपुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे जाळे आहे. परंतु विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य तारा अतिशय जुन्या झाल्याने पाऊस व वारा सुरू होताच वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-मोठ्या बिघाडाकडे लाईनमन लक्ष देत नाहीत, त्यामुळे रात्र-रात्र अंधारात राहण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. चोरवड परिसरात तर मागील महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. या भागातील लाईनमन महिना-महिना फिरकत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. साहित्य जुनाट झाल्याने वीज कंपनीचा कारभार रामभरोसे बनलेला आहे. या विजेच्या लपंडावात वाढ होताना दिसत आहे. विजेचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चोरवडचे सरपंच बाळासाहेब देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)वीज पुरवठा टिकेनावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका घरगुती ग्राहक, व्यवसायिक व कृषीपंपधारकांना बसत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा सुरळीत होत नाही. विद्युत पुरवठ्यात नेहमीच बिघाड होत असल्याने सुरळीत पुरवठा होणे कठीण झाले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.लाईमन फिरकेना...वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळी तक्रार करीत आहेत. परंतु या तक्रारीची दखल घेण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. लाईनमनवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याने ग्रामीण भागाकडे लाईनमन फिरकत नाही.