शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानामुळे वाढू शकते मराठवाड्यात पावसाचे प्रमाण

By admin | Updated: June 7, 2016 23:47 IST

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पावसाचे प्रमाण सरासरी २० टक्के वाढू शकते. शिवाय विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानावरील खर्चही क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानापेक्षा खूपच कमी आहे, असा दावा आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीजचे संचालक मॅट हॅण्डबरी यांनी केला. द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘विद्युत लहरीच्या वापराने पर्जन्यमानात वाढ’ या विषयावर मंगळवारी मॅट हॅण्डबरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी शंकरराव नागरे, द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सचे मिलिंद पाटील आणि एस. डी. चांदसुरे यांची उपस्थिती होती. हॅण्डबरी हे विद्युत लहरी वापरून पर्जन्यमानात वाढ करण्याच्या संकल्पनेचे अभ्यासक आणि आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. त्यांनी सादरीकरणाद्वारे ही संकल्पना, तिचे फायदे, यशस्वतीचा दर आदींविषयी सविस्तर विवेचन केले. हॅण्डबरी म्हणाले, द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरवून आयोनाझेशनच्या क्रियेने पर्जन्यमानात वाढ करण्याचा प्रकल्प आॅस्ट्रेलियासह इतरही काही देशांमध्ये उपयुक्त ठरला आहे. या प्रयोगाच्या नोंदीनुसार तेथील पर्जन्यमानात सरासरी २० टक्के वाढ झाली. मराठवाड्यातही या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये हे तंत्रज्ञान सर्वात स्वस्त आहे.अशी होतेय प्रक्रिया...पावसाळ्यात बऱ्याच वेळा आकाशात ढग येतात. परंतु भूपृष्ठावरील अमैत्रीपूर्ण तापमानाच्या स्थितीमुळे हे ढग बरसत नाही. ते तसेच वाऱ्यासोबत पुढे दुसऱ्या प्रदेशात जातात. या तंत्रज्ञानात ढगांना अनुकूल स्थिती निर्माण करून हव्या त्या ठिकाणी कृत्रिमरीत्या बरसवले जाते. यासाठी द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरविल्या जातात. विद्युत लहरी ढगांमध्ये गेल्यावर त्या ढगांशी रिअ‍ॅक्ट होतात.विद्युतलहरी तंत्रज्ञानात टॉवर उभारले जातात. धातूच्या तारांमध्ये ढगांच्या दिशेने ऊर्जा प्रवाहित केली जाते. ढगांमधील पाण्याचे बारीक बारीक थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठ्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते. त्यानंतर हे थेंब ढगांपासून विलग होऊन खाली बरसतात.