शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानामुळे वाढू शकते मराठवाड्यात पावसाचे प्रमाण

By admin | Updated: June 7, 2016 23:47 IST

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पावसाचे प्रमाण सरासरी २० टक्के वाढू शकते. शिवाय विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानावरील खर्चही क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानापेक्षा खूपच कमी आहे, असा दावा आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीजचे संचालक मॅट हॅण्डबरी यांनी केला. द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘विद्युत लहरीच्या वापराने पर्जन्यमानात वाढ’ या विषयावर मंगळवारी मॅट हॅण्डबरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी शंकरराव नागरे, द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सचे मिलिंद पाटील आणि एस. डी. चांदसुरे यांची उपस्थिती होती. हॅण्डबरी हे विद्युत लहरी वापरून पर्जन्यमानात वाढ करण्याच्या संकल्पनेचे अभ्यासक आणि आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. त्यांनी सादरीकरणाद्वारे ही संकल्पना, तिचे फायदे, यशस्वतीचा दर आदींविषयी सविस्तर विवेचन केले. हॅण्डबरी म्हणाले, द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरवून आयोनाझेशनच्या क्रियेने पर्जन्यमानात वाढ करण्याचा प्रकल्प आॅस्ट्रेलियासह इतरही काही देशांमध्ये उपयुक्त ठरला आहे. या प्रयोगाच्या नोंदीनुसार तेथील पर्जन्यमानात सरासरी २० टक्के वाढ झाली. मराठवाड्यातही या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये हे तंत्रज्ञान सर्वात स्वस्त आहे.अशी होतेय प्रक्रिया...पावसाळ्यात बऱ्याच वेळा आकाशात ढग येतात. परंतु भूपृष्ठावरील अमैत्रीपूर्ण तापमानाच्या स्थितीमुळे हे ढग बरसत नाही. ते तसेच वाऱ्यासोबत पुढे दुसऱ्या प्रदेशात जातात. या तंत्रज्ञानात ढगांना अनुकूल स्थिती निर्माण करून हव्या त्या ठिकाणी कृत्रिमरीत्या बरसवले जाते. यासाठी द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरविल्या जातात. विद्युत लहरी ढगांमध्ये गेल्यावर त्या ढगांशी रिअ‍ॅक्ट होतात.विद्युतलहरी तंत्रज्ञानात टॉवर उभारले जातात. धातूच्या तारांमध्ये ढगांच्या दिशेने ऊर्जा प्रवाहित केली जाते. ढगांमधील पाण्याचे बारीक बारीक थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठ्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते. त्यानंतर हे थेंब ढगांपासून विलग होऊन खाली बरसतात.