शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानामुळे वाढू शकते मराठवाड्यात पावसाचे प्रमाण

By admin | Updated: June 7, 2016 23:47 IST

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला

औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पावसाचे प्रमाण सरासरी २० टक्के वाढू शकते. शिवाय विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानावरील खर्चही क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानापेक्षा खूपच कमी आहे, असा दावा आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीजचे संचालक मॅट हॅण्डबरी यांनी केला. द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘विद्युत लहरीच्या वापराने पर्जन्यमानात वाढ’ या विषयावर मंगळवारी मॅट हॅण्डबरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी शंकरराव नागरे, द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सचे मिलिंद पाटील आणि एस. डी. चांदसुरे यांची उपस्थिती होती. हॅण्डबरी हे विद्युत लहरी वापरून पर्जन्यमानात वाढ करण्याच्या संकल्पनेचे अभ्यासक आणि आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. त्यांनी सादरीकरणाद्वारे ही संकल्पना, तिचे फायदे, यशस्वतीचा दर आदींविषयी सविस्तर विवेचन केले. हॅण्डबरी म्हणाले, द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरवून आयोनाझेशनच्या क्रियेने पर्जन्यमानात वाढ करण्याचा प्रकल्प आॅस्ट्रेलियासह इतरही काही देशांमध्ये उपयुक्त ठरला आहे. या प्रयोगाच्या नोंदीनुसार तेथील पर्जन्यमानात सरासरी २० टक्के वाढ झाली. मराठवाड्यातही या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये हे तंत्रज्ञान सर्वात स्वस्त आहे.अशी होतेय प्रक्रिया...पावसाळ्यात बऱ्याच वेळा आकाशात ढग येतात. परंतु भूपृष्ठावरील अमैत्रीपूर्ण तापमानाच्या स्थितीमुळे हे ढग बरसत नाही. ते तसेच वाऱ्यासोबत पुढे दुसऱ्या प्रदेशात जातात. या तंत्रज्ञानात ढगांना अनुकूल स्थिती निर्माण करून हव्या त्या ठिकाणी कृत्रिमरीत्या बरसवले जाते. यासाठी द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरविल्या जातात. विद्युत लहरी ढगांमध्ये गेल्यावर त्या ढगांशी रिअ‍ॅक्ट होतात.विद्युतलहरी तंत्रज्ञानात टॉवर उभारले जातात. धातूच्या तारांमध्ये ढगांच्या दिशेने ऊर्जा प्रवाहित केली जाते. ढगांमधील पाण्याचे बारीक बारीक थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठ्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते. त्यानंतर हे थेंब ढगांपासून विलग होऊन खाली बरसतात.