शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसाचा दिलासा

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी १६ मि.मी. पाऊस झाला असला तरी माना टाकणाऱ्या पिकांसाठी हा पाऊस ‘आॅक्सीजन’ ठरला आहे.यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती अतिशय नाजूक झाली होती. सरासरीच्या १३ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाळ्याच्या दिवसांतही कडक ऊन, वाढलेला उकाडा आणि पाण्यासाठी भटकंती असे उन्हाळ्यातील चित्र नागरिक अनुभवत आहेत. पिकांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबिन ही मुख्य पिके असून, दीड महिन्यांपासून पाऊसच नसल्याने पिके माना टाकू लागली होती. चार-आठ दिवस पाऊस झाला नाही तर ही पिके भुईसपाट होण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले होते. या संकटकाळातच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे वरुणराजा मदतीला धाऊन आला. २२ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सेलू आणि जिंतूर या तालुक्याची मात्र निराशा केली आहे. परभणी तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस झाला. सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रथमच येथील नागरिकांनी पावसाळी वातावरण अनुभवले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १६ मि.मी. पाऊस२२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.८१ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यात ०.४० तर जिंतूर तालुक्यात फक्त १ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ५२ मि.मी. पाऊस सोनपेठ तालुक्यात झाला असून, त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यात ३७.७५, परभणी तालुक्यात १५.३८, पालम १०, पाथरी ९, पूर्णा ८.४० आणि मानवत तालुक्यात ८.३३ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १५३.४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २११ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात ६१० मि.मी. पाऊस झाला होता, हे विशेष.मराठवाड्याची स्थितीआजपर्यंत होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ ३५.२९ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २९.३ टक्के, जालना जिल्ह्यात ३६.१४ टक्के, परभणी जिल्ह्यात ३६.५८ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ४३.०६ टक्के, नांदेड जिल्ह्यात ३९.७८ टक्के, बीड जिल्ह्यात ३२.५३ टक्के, लातूर जिल्ह्यात ३६.४३ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात २३.७१ टक्के पाऊस झाला आहे.पिकांना जीवदानशुक्रवारी जिल्ह्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर हा पाऊस झाला. अल्प पावसावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. कापूस, सोयाबिन ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात होती. जमिनीतील पाणी पातळी कमी होत असल्याने दोन्ही पिके धोक्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे.