शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रेल्वेस्थानक,गाड्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

विजय बगाटे , पूर्णा रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

विजय बगाटे , पूर्णारेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. पूर्णा हे मराठवाड्यातील रेल्वेचे मोठे जंक्शन असून १०० वर्षाचा इतिहास पूर्णा रेल्वेस्थानकाला आहे. येथून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अमृतसर, भोपाळ, अलाहाबाद, तिरूपती, विशाखा पटनम, पाटना, मनमाड, हैदराबाद, सिकंदराबाद, नागपूर, अदिलाबाद, पंढरपूर, इंदौर, बंगळुरू, कोल्हापूर, बिदर यासह देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या दररोज व आठवडी टाईमटेबल्या हिशोबाने धावत असतात. या गाड्यांपैकी देवगिरी, नंदीग्राम व अजिंठा या दोन तीन गाड्या वगळता एकाही एक्सप्रेस गाडीला सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षागार्ड ठेवले जात नाही. सर्व गाड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अनेक गाड्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा रेल्वेस्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे स्वतंत्र कार्यालय आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षा पुरविण्याविली जात नाही. नागपूर रेल्वे पोलिसांची चौकी असून पोलिस स्टेशन नांदेड येथे आहे. चौकीत केवळ दोन ते तीन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे रेल्वेस्टेशनला देखील ते सुरक्षा देऊ शकत नाहीत. रेल्वेचे मोठे जंक्शन असताना देखील या ठिकाणचे रेल्वे पोलिस स्टेशन नांदेड येथे वर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा रेल्वे जंक्शनची सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. दररोज ४० ते ५० लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या पूर्णा येथून धावत असतात. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय आहेत. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीत फेरीवाले ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, अशा फेरीवाले व विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांच्या वतीने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.तृतीयपंथ्यांची संख्या वाढलीया गाड्यांमधून भिकारी व तृतीयपंथी लोकांची संख्या वाढली असून सदरील लोक प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सतत करीत असतात. प्रवासी आपल्या गावाला जात असल्यामुळे तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या प्रकरणी रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल व नागपूर रेल्वे पोलिस या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णा जंक्शन या रेल्वेस्थानकाची व धावत्या प्रवासी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरावावी, अशी मागणी सामान्य प्रवासीवर्गातून होत आहे.