शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रेल्वेस्थानक,गाड्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

विजय बगाटे , पूर्णा रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

विजय बगाटे , पूर्णारेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. पूर्णा हे मराठवाड्यातील रेल्वेचे मोठे जंक्शन असून १०० वर्षाचा इतिहास पूर्णा रेल्वेस्थानकाला आहे. येथून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अमृतसर, भोपाळ, अलाहाबाद, तिरूपती, विशाखा पटनम, पाटना, मनमाड, हैदराबाद, सिकंदराबाद, नागपूर, अदिलाबाद, पंढरपूर, इंदौर, बंगळुरू, कोल्हापूर, बिदर यासह देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या दररोज व आठवडी टाईमटेबल्या हिशोबाने धावत असतात. या गाड्यांपैकी देवगिरी, नंदीग्राम व अजिंठा या दोन तीन गाड्या वगळता एकाही एक्सप्रेस गाडीला सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षागार्ड ठेवले जात नाही. सर्व गाड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अनेक गाड्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा रेल्वेस्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे स्वतंत्र कार्यालय आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षा पुरविण्याविली जात नाही. नागपूर रेल्वे पोलिसांची चौकी असून पोलिस स्टेशन नांदेड येथे आहे. चौकीत केवळ दोन ते तीन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे रेल्वेस्टेशनला देखील ते सुरक्षा देऊ शकत नाहीत. रेल्वेचे मोठे जंक्शन असताना देखील या ठिकाणचे रेल्वे पोलिस स्टेशन नांदेड येथे वर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा रेल्वे जंक्शनची सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. दररोज ४० ते ५० लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या पूर्णा येथून धावत असतात. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय आहेत. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीत फेरीवाले ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, अशा फेरीवाले व विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांच्या वतीने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.तृतीयपंथ्यांची संख्या वाढलीया गाड्यांमधून भिकारी व तृतीयपंथी लोकांची संख्या वाढली असून सदरील लोक प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सतत करीत असतात. प्रवासी आपल्या गावाला जात असल्यामुळे तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या प्रकरणी रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल व नागपूर रेल्वे पोलिस या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णा जंक्शन या रेल्वेस्थानकाची व धावत्या प्रवासी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरावावी, अशी मागणी सामान्य प्रवासीवर्गातून होत आहे.