शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला

By admin | Updated: January 6, 2015 01:09 IST

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे.

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे. गतवर्षी सरासरी ऐवढे पर्जन्यमान होऊनही जिल्ह्यात रबीची पेरणी ६७ टक्के ऐवढी झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना सरासरी क्षेत्रापैकी ६२ टक्के क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून त्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४३ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी १ लाख ४५ हजार सातशे हेक्टरवर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. या हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदींची लागवड केली जाते. गतवर्षी सरासरी इतका पाऊस होऊनही ६७ टक्केच रबीची पेरणी झाली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यावरच येऊन ठेपले असले तरी अशादायी शेतकऱ्यांनी ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी पाणीटंचाईचे सावट संपूर्ण रबीवर जाणवू लागले आहे. रबीतील पिके बहरात असतानाच अवकाळी पावासाने काही पिकांना आधार भेटला आहे तर काहींना धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने नगदी पिकांपेक्षा जनावरांना चारा होईल अशा पिकांचीच लागवड अधिक प्रमाणात केली आहे. तर जास्त पाणी व निघराणीत ठेवावी लागणाऱ्या पिकांकडे यंदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)४दुष्काळी परिस्थितीचा फटका गहू उत्पादनावर अधिक झाला आहे. सरासरी ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १५ हजार दोनशे हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी ३० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.