शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

अवकाळीचा रबीला फटका

By admin | Updated: January 2, 2015 00:52 IST

औरंगाबाद : आठवडाभरापासून थंडीची लाट अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यास बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी पावसाने दणका दिला.

औरंगाबाद : आठवडाभरापासून थंडीची लाट अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यास बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी पावसाने दणका दिला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात रबी ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वातावरण असेच राहिले तर ज्वारीचे दाणे भरण्याची प्रक्रियाही थांबणार आहे. दुष्काळामुळे आधीच खरीप हातचे गेले. आता पावसामुळे रबीलाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून थंडीची तीव्र लाट आली आहे. त्यातच बुधवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वैजापूर आणि गंगापूर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत बुधवारी रात्री पाऊस झाला. त्यानंतर आज गुरुवारीही पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. शहरात सकाळच्या वेळी कधी ऊन तर कधी पाऊस, असा खेळ बघायला मिळाला. पावसामुळे आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत होते. आधीच दुष्काळामुळे खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर आता या बदललेल्या वातावरणाचा रबी पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारीची पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू आणि हरभरा ही पिके आहेत. अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकावर चिकटा पडण्याची शक्यता आहे. हरभरा पिकाला मात्र, या पावसामुळे काहीसा फायदाच होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी सतीश शिरडकर यांनी सांगितले. पावसाचा जोर कमी असल्यामुळे आणि वारा नसल्यामुळे गव्हाचे मात्र नुकसान झालेले नाही, असेही शिरडकर म्हणाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते यांनीही ज्वारीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण आणखी एक-दोन दिवस राहिले तर ज्वारीचे मोठे नुकसान होऊ शकेल. ज्वारीवर कीड वाढेल. शिवाय दाणे भरण्याची प्रक्रियाही थांबू शकते. त्यामुळे हे ढगाळ वातावरण जाऊन आभाळ स्वच्छ होणे गरजेचे आहे.