शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा विल्हेवाटीचा पालिकेसमोर प्रश्न

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

जालना: शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनांपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे.

जालना: शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनांपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर कचरामय बनले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून सहा वर्षांपासून लाखो रुपर्य खर्चून तयार होत असलेला घनकचरा प्रकल्प लाल फितीच्या कारभारात अडकला आहे.२००८-०९ मध्ये पालिकेने सामनगाव परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आजपर्यंत येथे संबंधित एजन्सीने ६४ लाख रुपयांची यंत्रणाही बसविली आहे. बाराव्या वित्त आयोगातील निधीतून इतर कामे करण्यात आली.सहा वर्षे उलटली असली तरी हा प्रकल्प का सुरु झाला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी मिळावा म्हणून पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. एकूणच हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेत आडकल्याने समस्या जटिल बनली आहे. हा प्रकल्प जैसे थेच असल्याने कचरा टाकण्यासाठी इतर ठिकाणीही जमीन संपादित करण्यात येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील वाढत्या कचऱ्यावर कायमस्वरुपी उपाय केंव्हा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.स्वच्छता विभागाच्या म्हणण्यानुसार शहर कचरामुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येते. नदीपात्र अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यात येत नाही. कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. याविषयी नगराध्यक्षा पद्मा भरतिया म्हणाल्या, प्रकल्पाचे काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्वच खर्चाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी दिले आहेत. कामाचे मूल्यांकन त्या काळातील यंत्रणेची चौकशी करुन जबाबदारी ठरविली जाणार आहे. राज्य शासनाकडून हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला आहे. शिवाय कंपनीकडूनही कामाच्या बाबतीत दिरंगाई झाली. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. (प्रतिनिधी)शहरात दररोज निघतो ८० टन कचराआयएसओ दर्जा प्राप्त पालिकेला शहर कचरामुक्त करण्यात यश आलेले नाही. शहरातील विविध रस्ते, प्रभाग, वसाहती मिळून सर्व प्रकारचा मिळून ८० टन कचरा निघतो. सर्व कचरा पालिकेकडून उचलला जात नाही, हेही वास्तव आहे. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पालिकेकडून कचरा उचलण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी वाढत्या कचऱ्यापुढे पालिकेची यंत्रणाही तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.