शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

कचरा विल्हेवाटीचा पालिकेसमोर प्रश्न

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

जालना: शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनांपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे.

जालना: शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनांपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर कचरामय बनले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून सहा वर्षांपासून लाखो रुपर्य खर्चून तयार होत असलेला घनकचरा प्रकल्प लाल फितीच्या कारभारात अडकला आहे.२००८-०९ मध्ये पालिकेने सामनगाव परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आजपर्यंत येथे संबंधित एजन्सीने ६४ लाख रुपयांची यंत्रणाही बसविली आहे. बाराव्या वित्त आयोगातील निधीतून इतर कामे करण्यात आली.सहा वर्षे उलटली असली तरी हा प्रकल्प का सुरु झाला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी मिळावा म्हणून पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. एकूणच हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेत आडकल्याने समस्या जटिल बनली आहे. हा प्रकल्प जैसे थेच असल्याने कचरा टाकण्यासाठी इतर ठिकाणीही जमीन संपादित करण्यात येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील वाढत्या कचऱ्यावर कायमस्वरुपी उपाय केंव्हा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.स्वच्छता विभागाच्या म्हणण्यानुसार शहर कचरामुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येते. नदीपात्र अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यात येत नाही. कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. याविषयी नगराध्यक्षा पद्मा भरतिया म्हणाल्या, प्रकल्पाचे काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्वच खर्चाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी दिले आहेत. कामाचे मूल्यांकन त्या काळातील यंत्रणेची चौकशी करुन जबाबदारी ठरविली जाणार आहे. राज्य शासनाकडून हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला आहे. शिवाय कंपनीकडूनही कामाच्या बाबतीत दिरंगाई झाली. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. (प्रतिनिधी)शहरात दररोज निघतो ८० टन कचराआयएसओ दर्जा प्राप्त पालिकेला शहर कचरामुक्त करण्यात यश आलेले नाही. शहरातील विविध रस्ते, प्रभाग, वसाहती मिळून सर्व प्रकारचा मिळून ८० टन कचरा निघतो. सर्व कचरा पालिकेकडून उचलला जात नाही, हेही वास्तव आहे. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पालिकेकडून कचरा उचलण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी वाढत्या कचऱ्यापुढे पालिकेची यंत्रणाही तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.