शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

अपूर्ण विहिरींचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: March 27, 2015 00:27 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

संजय कुलकर्णी , जालनाजिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून मार्चपूर्वी सुमारे चारशे तर उर्वरित कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात मग्रारोहयोतून सिंचन विहिरींची जी कामे हाती घेण्यात आली, त्यापैकी चार हजार कामे अपूर्ण आहेत. कुशल कामांची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. याविषयीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभांमधूनही चर्चिला गेला होता. लाभधारकांना तातडीने पेमेंट मिळावे व सिंचन सुविधा वाढवावी, या उद्देशाने सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने अतिरिक्त सूचना दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या ७५ टक्के पूर्ण असलेल्या विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यानंतर उर्वरीत विहिरींची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये ५ पोलच्या आत विद्युत पुरवठा असावा ही अट शिथिल करण्यात आली आहे. तथापि ५ पोलच्या आत विद्युतपुरवठा उपलब्ध नसल्यास संबंधित लाभधारक त्याची जमीन डिझेल इंजिन किंवा सोलार इंजिनच्या सहाय्याने सिंचित करेल व त्यावरील खर्चाची जबाबदारी संबंधित लाभधारकाची राहिल, असे हमीपत्र संबंधित लाभधारकाकडून लिहून घेण्यात येणार आहे. (क्रमश:)