शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अपूर्ण विहिरींचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: March 27, 2015 00:27 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

संजय कुलकर्णी , जालनाजिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून मार्चपूर्वी सुमारे चारशे तर उर्वरित कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात मग्रारोहयोतून सिंचन विहिरींची जी कामे हाती घेण्यात आली, त्यापैकी चार हजार कामे अपूर्ण आहेत. कुशल कामांची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. याविषयीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभांमधूनही चर्चिला गेला होता. लाभधारकांना तातडीने पेमेंट मिळावे व सिंचन सुविधा वाढवावी, या उद्देशाने सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने अतिरिक्त सूचना दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या ७५ टक्के पूर्ण असलेल्या विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यानंतर उर्वरीत विहिरींची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये ५ पोलच्या आत विद्युत पुरवठा असावा ही अट शिथिल करण्यात आली आहे. तथापि ५ पोलच्या आत विद्युतपुरवठा उपलब्ध नसल्यास संबंधित लाभधारक त्याची जमीन डिझेल इंजिन किंवा सोलार इंजिनच्या सहाय्याने सिंचित करेल व त्यावरील खर्चाची जबाबदारी संबंधित लाभधारकाची राहिल, असे हमीपत्र संबंधित लाभधारकाकडून लिहून घेण्यात येणार आहे. (क्रमश:)