शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:57 IST

जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, प्रत्येक घरातील एक व्यक्ती आजारी पडली आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला. यावरून विरोधी सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. हाच मुद्दा या बैठकीत गाजला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गुरुवारी येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीला सदस्य शालिग्राम म्हस्के म्हणाले की, विभाग प्रमुख गैरहजर राहून कनिष्ठ कर्मचा-यांना सभेला पाठवतात. त्यामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांना सभेला पाठवायचे का? यावर अध्यक्षांनी माहिती घेतली असता, बहुतांश विभागप्रमुख सभेस गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात सध्या दूषित पाणीपुरवठा होत असून, बहुतांश गावांमध्ये तापाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याच सुविधा नाहीत. औषधी उपलब्ध नाहीत. आरोग्य केंद्रात गेल्यानंतर डॉक्टर, परिचारिका हजर राहत नाहीत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रक्त नमुने घेण्यासाठी आवश्यक साधने आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. तापाची गोळी वाटप करण्यापलीकडे आरोग्य विभाग काहीच करत नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. यावर आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी अध्यक्षांच्या सूचनेवरून खुलासा सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. आरोग्य विभागाकडे ४५ फॉगिंंग मशीन उपलब्ध असताना ग्रामीण भागात कुठेच धूर फवारणी केली जात नाही.मशीन नादुरुस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत असल्याचा आरोप जयमंगल जाधव यांनी केला. आरोग्य अधिकारी खोटे बोलून वेळ मारून नेण्यात पटाईत असल्याचे ते म्हणाले. विविध विभागांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचा-यांमुळे सर्वच विभागांचे कामकाज ढेपाळले आहे. अशा कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी अवधूत खडके यांनी केली. यावर अध्यक्ष खोतकर यांनी काही विभागांत कर्मचारी कमी असल्यामुळे प्रतिनियुक्तीवर कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आल्याचे सागितले.