शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

स्थायी समितीत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:57 IST

जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, प्रत्येक घरातील एक व्यक्ती आजारी पडली आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला. यावरून विरोधी सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. हाच मुद्दा या बैठकीत गाजला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गुरुवारी येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीला सदस्य शालिग्राम म्हस्के म्हणाले की, विभाग प्रमुख गैरहजर राहून कनिष्ठ कर्मचा-यांना सभेला पाठवतात. त्यामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांना सभेला पाठवायचे का? यावर अध्यक्षांनी माहिती घेतली असता, बहुतांश विभागप्रमुख सभेस गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात सध्या दूषित पाणीपुरवठा होत असून, बहुतांश गावांमध्ये तापाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याच सुविधा नाहीत. औषधी उपलब्ध नाहीत. आरोग्य केंद्रात गेल्यानंतर डॉक्टर, परिचारिका हजर राहत नाहीत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रक्त नमुने घेण्यासाठी आवश्यक साधने आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. तापाची गोळी वाटप करण्यापलीकडे आरोग्य विभाग काहीच करत नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. यावर आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी अध्यक्षांच्या सूचनेवरून खुलासा सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. आरोग्य विभागाकडे ४५ फॉगिंंग मशीन उपलब्ध असताना ग्रामीण भागात कुठेच धूर फवारणी केली जात नाही.मशीन नादुरुस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत असल्याचा आरोप जयमंगल जाधव यांनी केला. आरोग्य अधिकारी खोटे बोलून वेळ मारून नेण्यात पटाईत असल्याचे ते म्हणाले. विविध विभागांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचा-यांमुळे सर्वच विभागांचे कामकाज ढेपाळले आहे. अशा कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी अवधूत खडके यांनी केली. यावर अध्यक्ष खोतकर यांनी काही विभागांत कर्मचारी कमी असल्यामुळे प्रतिनियुक्तीवर कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आल्याचे सागितले.