शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुलांच्या ताब्यावरून न्यायालयाच्या आवारात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:00 IST

मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : न्यायालयाने नोटीस दिल्यानंतर मुलांचा ताबा घेण्यासाठी आई माहेराकडील नातेवाइकांसह न्यायालयात आली. वडीलही मुलांना घेऊन न्यायालयात पोहोचले. आईला मुलांचा रीतसर ताबाही मिळाला. मात्र, मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली. येथील न्यायालयाच्या आवारात गुुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी येथील प्रवीण बाबूराव कुºहाडे यांचा पत्नी कल्पना यांच्यासोबत कौटुंबिक वाद आहे. या दाम्पत्याची तिन्ही मुले रोहन (४), पूनम (३) व पायल (७ महिने) वडील प्रवीण हिवाळे यांच्याकडे राहत होती. मुलांचा ताबा आपणास देण्यात यावा यासाठी कल्पना यांनी परतूर न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने मुलांना आईच्या ताब्यात देण्याची नोटीस प्रवीण हिवाळे यांना दिली. त्यानुसार हिवाळे गुरुवारी नातेवाईकांसह तिन्ही मुलांना घेऊन परतूर न्यायालयात आले. मुलांना आईच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी मुलांच्या गळ्यातील सोन्याचा ‘ओम’, कानातील दागिने, चांदीचे वाळे गायब असल्याने कल्पना यांनी पतीकडे दागिन्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच हाणामारी सुरू झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले. वडीहून आलेला मुलांचा पिता व सोबतच्यांना पोलीस बंदोबस्तात गावी नेऊन सोडण्यात आले. चार वर्षाचा रोहन वडिलांकडे जायचे म्हणून रडत होता, तर त्याच्या दोन्ही बहिणी निरागसपणे घडत असलेला सर्व प्रकार पाहत होत्या. मुलांची आई कल्पना यांच्याकडून अ‍ॅड. झेड. एन. कादरी यांनी काम पाहिले.