शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शेतजमिनीच्या सुपिकतेचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे. शेती जनिमीची सुपिकता दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे. सरासरी निर्देशांक १ असावा मात्र मृद चाचणीवरून हा निर्देशांक ०.७१ एवढा असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण सुपिकता पातळी अत्यंत कमी असल्याचे दर्शविते. तर पालाशचे प्रमाण भरपूर असल्याचे मृद चाचणी अहवालात म्हटले आहे. खरीप हंगामा तोडावर आला असून, शेतकऱ्यांची शेती नांगरणीसाठी लगबग सुरू अहे. शेती कामांना वेग आला आहे. मात्र सुपिकतेचा विचार करता बाब चिंता जनक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार हेक्टर लागवाडी खालील क्षेत्र आहे. यात खरीप हंगामात ५ लाख ६१ हजार तर रबी हंगामात २ लाख १८ हजार हेक्टरवर लागवड होते. गत काही वर्षांत मृद चाचणी अववाल चिंताजनक आकडेवारी दाखवित आहे. पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाण्यासोबत रासायानिक खतांचा दरवर्षी अतिवापर यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत आहे. फिरती प्रयोग शाळा तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मातीचे ननुन्यांची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका काढण्यात येते. त्यावरून सुपिकतेचे चित्र स्पष्ट होते. २०१६-१७ वर्षांत आठही तालुक्यातील ६४७ गावांतून ४४ हजार ९६० माती नुमन्यांची तपासणी करण्यात आली. २ लाख २२ हजार ८६५ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.