शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कीर्तनाद्वारे लोकप्रबोधन

By admin | Updated: July 9, 2014 00:08 IST

विलास चव्हाण, परभणी संत तुकाराम महाराज यांनी संसार करून परमार्थ साधून किर्तनाद्वारे लोकप्रबोधन केले होते़

विलास चव्हाण, परभणीसंत तुकाराम महाराज यांनी संसार करून परमार्थ साधून किर्तनाद्वारे लोकप्रबोधन केले होते़ त्याचप्रमाणे गुरुवर्य ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी परमार्थ साधून किर्तनाद्वारे अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा तसेच व्यसनापासून लोकांनी दूर राहण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले़ जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे एका शेतकरी कुंटुंबात ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांचा जन्म झाला होता़ जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा व रुढी परंपरेचा पगडा मोठा होता़ त्यामुळे या लोकांमध्ये एक प्रकारे नैराश्य आल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला होता़ त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते़ ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी आपल्या किर्तनातून जनजागृतीमुळे अनेकांनी गळ्यात माळा घातल्याने संसार उध्वस्त होता होता वाचले़ ह़ भ़ प़ नथूराम महाराज किर्तनासाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नव्हते़ तसेच किर्तनसाठी प्रवास खर्च, मानधन किंवा वाहनाची व्यवस्था अशी कसलीही अट त्यांनी कधीच घातली नाही़ ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांचे कीर्तन ऐकण्यायाठी गावासह पंचक्रोषीतील लोक मोठ्या भक्तीभावाने येत होते़ त्यांचे कीर्तन हे साध्या, सोप्या भाषेत व समजेल असे असल्याने लोकांना ते आपले महाराज वाटू लागायाचे़ गोरगरीबांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी स्वत: पुढाकार घेत होते़ ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी आषाढी कार्तिकी वारीला पायी दिंडी नेण्याचा प्रघात सुरू केला़ या दिंडीमध्ये असंख्य वारकरी सहभागी होत होते़ तसेच नाथषष्ठीला नाथांच्या पैठणला आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीला दिंडी नेण्याची प्रथा सुरू केली होती़ ५० वर्षांपासून वाऱ्या अव्याहतपणे सुरू आहेत़ वारकरी सांप्रदायातील थोर प्रवर्तक या दृष्टीकोनातून गुरुवर्य ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांचे वारकरी संप्रादायात मानाचे स्थान आहे़ त्यांचे अनुयायी मराठवाड्यासह विदर्भात मोठ्या संख्येने आहेत़