शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीमुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर ...

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई होत असल्याने मोबाइलवर बोलत वाहन चालविताना अपघात होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांपर्यंत घटल्याचे सूत्रांनी सांगितले. दरवर्षी शहरात रस्ते अपघातात सरासरी दीडशे लोकांचे बळी जातात. विनाहेल्मेट दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण ७० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सरासरी ५०० हून अधिक रस्ते अपघात होतात. यात १५० प्राणांतिक तर गंभीर अपघातांची संख्या २०० हून अधिक असते. उर्वरित अपघात किरकोळ स्वरूपाचे असतात. दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी १५० हून अधिक नागरिकांचे बळी जातात. तर गंभीर जखमींची संख्या ३०० च्या आसपास असते. अपघातांना अनेक बाबी कारणीभूत आहेत. यापैकी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालविताना चालकाचे लक्ष विचलित होते आणि अपघाताचा धोका वाढतो. यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला आहे. मोबाइलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. यामुळे मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मोबाइलमुळे अपघात होण्याचे प्रमाण तीन टक्केच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

-------------------------

२०२० मध्ये शहरात झालेले अपघात

प्राणांतिक अपघात- ३५२

अपघातामधील जखमी- २५३

मृत्यू- १२१

-------------------------------------

वाहतूक नियम माेडणाऱ्या चालकांवर झालेली कारवाई आणि दंडाची रक्कम

वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे - ७ हजार २८८- १४ लाख ५७ हजार ६०० रुपये

विनाहेल्मेट - १५ हजार ४६८- ७७ लाख ३४ हजार रुपये

सिग्नल तोडणे - १८ हजार ५७७- ३७ लाख १५ हजार ४०० रुपये

------------------------

चौकट

हेल्मेट नसल्यामुळे गतवर्षी ३४ दुचाकीस्वार मुकले प्राणास

अपघातामधील मृत्यूविषयी सूत्रांनी सांगितले की, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यास, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या मृत्यूची शक्यता ७० टक्क्यांपर्यंत असते. २०२० मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकांपैकी ३४ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------------

स्पीडगनद्वारेही सुसाट वाहनचालकांवर कारवाई

वाहनचालकांनी वेगमर्यादा न पाळल्यास अपघाताचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस वाहतूक विभागाकडून दोन स्पीडगन यंत्रांद्वारे सुसाट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या वर्षी मार्च ते जून या कालावधीत ५ हजार ८४६ सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईंतर्गत त्यांना ५ लाख ४६ हजार ६०० रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक दुचाकीचालकांनी हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर पोलीस आणि आरटीओ अधिकारी दंडात्मक कारवाई करतात.