शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीमुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर ...

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई होत असल्याने मोबाइलवर बोलत वाहन चालविताना अपघात होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांपर्यंत घटल्याचे सूत्रांनी सांगितले. दरवर्षी शहरात रस्ते अपघातात सरासरी दीडशे लोकांचे बळी जातात. विनाहेल्मेट दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण ७० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सरासरी ५०० हून अधिक रस्ते अपघात होतात. यात १५० प्राणांतिक तर गंभीर अपघातांची संख्या २०० हून अधिक असते. उर्वरित अपघात किरकोळ स्वरूपाचे असतात. दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी १५० हून अधिक नागरिकांचे बळी जातात. तर गंभीर जखमींची संख्या ३०० च्या आसपास असते. अपघातांना अनेक बाबी कारणीभूत आहेत. यापैकी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालविताना चालकाचे लक्ष विचलित होते आणि अपघाताचा धोका वाढतो. यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला आहे. मोबाइलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. यामुळे मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मोबाइलमुळे अपघात होण्याचे प्रमाण तीन टक्केच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

-------------------------

२०२० मध्ये शहरात झालेले अपघात

प्राणांतिक अपघात- ३५२

अपघातामधील जखमी- २५३

मृत्यू- १२१

-------------------------------------

वाहतूक नियम माेडणाऱ्या चालकांवर झालेली कारवाई आणि दंडाची रक्कम

वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे - ७ हजार २८८- १४ लाख ५७ हजार ६०० रुपये

विनाहेल्मेट - १५ हजार ४६८- ७७ लाख ३४ हजार रुपये

सिग्नल तोडणे - १८ हजार ५७७- ३७ लाख १५ हजार ४०० रुपये

------------------------

चौकट

हेल्मेट नसल्यामुळे गतवर्षी ३४ दुचाकीस्वार मुकले प्राणास

अपघातामधील मृत्यूविषयी सूत्रांनी सांगितले की, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यास, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या मृत्यूची शक्यता ७० टक्क्यांपर्यंत असते. २०२० मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकांपैकी ३४ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------------

स्पीडगनद्वारेही सुसाट वाहनचालकांवर कारवाई

वाहनचालकांनी वेगमर्यादा न पाळल्यास अपघाताचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस वाहतूक विभागाकडून दोन स्पीडगन यंत्रांद्वारे सुसाट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या वर्षी मार्च ते जून या कालावधीत ५ हजार ८४६ सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईंतर्गत त्यांना ५ लाख ४६ हजार ६०० रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक दुचाकीचालकांनी हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर पोलीस आणि आरटीओ अधिकारी दंडात्मक कारवाई करतात.