शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

स्मार्ट सिटीत वाटा टाकण्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:03 IST

पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीत निवड झाली. त्याचवेळी महापालिकेने स्मार्ट सिटीतून करावयाच्या कामांचा आराखडा सादर केला होता. त्यानुसार ...

पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीत निवड झाली. त्याचवेळी महापालिकेने स्मार्ट सिटीतून करावयाच्या कामांचा आराखडा सादर केला होता. त्यानुसार केंद्र, राज्य आणि महापालिका अशा तिन्ही घटकांकडून स्मार्ट सिटीला एक हजार कोटींचा निधी मिळणार आहे. यात केंद्र सरकारचे ५०० कोटी, तर राज्य आणि महापालिकेचे प्रत्येकी २५० कोटी असा हिस्सा असणार आहे. आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने स्मार्ट सिटीला ५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून सिटी बस सेवा, एमएसआय, सफारी पार्क यासह इतरही अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत महापालिकेने स्वत:चा एक रुपयाचाही निधी टाकलेला नाही. महापालिकेने स्वत:च्या हिस्सा टाकल्याशिवाय स्मार्ट सिटीचा पुढील टप्प्यातील निधी देण्यात येणार नाही, असे काही दिवसांपूर्वी केंद्रीय अधिकाऱ्यांनी सुनावले होते. पुढे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय सहसचिव कुणालकुमार यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मनपाची परिस्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. स्वत:चा वाटा टाकण्यास मनपाला पुढील वर्षापर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती केली. तसेच तोपर्यंत केंद्र शासनाने स्मार्ट सिटीचा पुढील टप्प्यातील निधी वितरित करावा, अशी गळही घातली. आता मनपा प्रशासकांनी २०२१-२२ च्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीत टाकण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.