शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी सुरू करण्यापूर्वीच मुदतवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत इरादापत्र मंजूर झालेल्या ६५ नवीन महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी ३२ समित्या स्थापन केल्या आहेत. ...

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत इरादापत्र मंजूर झालेल्या ६५ नवीन महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी ३२ समित्या स्थापन केल्या आहेत. तथापि, या समित्यांकडून तपासणीला सुरुवात होण्याअगोदरच दुसऱ्या टप्प्यातील १६ पैकी ६ महाविद्यालयांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मुदतवाढ मागितली आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ४५ नवीन महाविद्यालयांकडे उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तपासणीसाठी ५ जून, तर दुसऱ्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांना १० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाने ६५ महाविद्यालयांना इरादापत्र मंजूर केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी त्यांना शासनाची अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या महाविद्यालयांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांच्याकडे पायाभूत सुविधांची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाने समित्या नेमल्या आहेत. समित्यांना तपासणीच्या वेळी वर्गखोल्या, प्राचार्यांचा कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रसाधनगृहांची तंतोतंत पडताळणी करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रत्येक बाबीचे मोजमाप निश्चित केले असून, विहित नमुन्यात चित्रीकरणासह अहवाल सादर करावा लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात इरादापत्र मिळालेल्या जवळपास सर्व महाविद्यालयांनी, तर दुसऱ्या टप्प्यातील १० महाविद्यालयांकडून अंतिम मंजुरीसाठी अनुपालन अहवाल सादर केला आहे. इरादापत्राची मान्यता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत असल्यामुळे ज्यांना चालू शैक्षणिक वर्षात अध्यापन कार्य सुरू करायचे आहे त्यांच्या तपासण्यांना सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करायचे आहे, त्यांंची ३१ जानेवारीपूर्वी कधीही तपासणी करता येईल, असे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

चौकट...........

समित्यांना करावी लागेल काटेकोर तपासणी

नवीन महाविद्यालयांची तपासणी करताना समिती सदस्यांना महाविद्यालयांना झुकते माप देता येणार नाही. आतापर्यंत संलग्नता देताना काही मर्जीतल्या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नसतानाही सर्व आलबेल असल्याचा अहवाल देऊन समित्यांनी विद्यापीठाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आता या समित्यांना काटेकोरपणे तपासणी करूनच अहवाल सादर करावा लागणार असून, चुकीचा अहवाल सादर केल्याचे निष्पन्न झाल्यास सदरील समिती सदस्यांना दोषी ठरविले जाणार आहे.