शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी सुरू करण्यापूर्वीच मुदतवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत इरादापत्र मंजूर झालेल्या ६५ नवीन महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी ३२ समित्या स्थापन केल्या आहेत. ...

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत इरादापत्र मंजूर झालेल्या ६५ नवीन महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी ३२ समित्या स्थापन केल्या आहेत. तथापि, या समित्यांकडून तपासणीला सुरुवात होण्याअगोदरच दुसऱ्या टप्प्यातील १६ पैकी ६ महाविद्यालयांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मुदतवाढ मागितली आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ४५ नवीन महाविद्यालयांकडे उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तपासणीसाठी ५ जून, तर दुसऱ्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांना १० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाने ६५ महाविद्यालयांना इरादापत्र मंजूर केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी त्यांना शासनाची अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या महाविद्यालयांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांच्याकडे पायाभूत सुविधांची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाने समित्या नेमल्या आहेत. समित्यांना तपासणीच्या वेळी वर्गखोल्या, प्राचार्यांचा कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रसाधनगृहांची तंतोतंत पडताळणी करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रत्येक बाबीचे मोजमाप निश्चित केले असून, विहित नमुन्यात चित्रीकरणासह अहवाल सादर करावा लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात इरादापत्र मिळालेल्या जवळपास सर्व महाविद्यालयांनी, तर दुसऱ्या टप्प्यातील १० महाविद्यालयांकडून अंतिम मंजुरीसाठी अनुपालन अहवाल सादर केला आहे. इरादापत्राची मान्यता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत असल्यामुळे ज्यांना चालू शैक्षणिक वर्षात अध्यापन कार्य सुरू करायचे आहे त्यांच्या तपासण्यांना सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करायचे आहे, त्यांंची ३१ जानेवारीपूर्वी कधीही तपासणी करता येईल, असे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

चौकट...........

समित्यांना करावी लागेल काटेकोर तपासणी

नवीन महाविद्यालयांची तपासणी करताना समिती सदस्यांना महाविद्यालयांना झुकते माप देता येणार नाही. आतापर्यंत संलग्नता देताना काही मर्जीतल्या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नसतानाही सर्व आलबेल असल्याचा अहवाल देऊन समित्यांनी विद्यापीठाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आता या समित्यांना काटेकोरपणे तपासणी करूनच अहवाल सादर करावा लागणार असून, चुकीचा अहवाल सादर केल्याचे निष्पन्न झाल्यास सदरील समिती सदस्यांना दोषी ठरविले जाणार आहे.