शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

अधिग्रहणाच्या प्रस्तावांचा ओघ

By admin | Updated: December 22, 2014 01:02 IST

सितम सोनवणे , लातूर पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुका स्तरावार टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़

सितम सोनवणे , लातूरपाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुका स्तरावार टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़ ९१ गावे व २४ वाड्यांतून अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ टंचाई कक्षात १९० प्रस्ताव सध्या दाखल आहेत़ जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेने १ डिसेंबरपासून तालुकानिहाय पंचायत समिती अंतर्गत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ मागणीनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या वतीने समन्वय बैठकीत करण्यात आल्या आहेत़ या टंचाई कक्षाचा प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे़ पाणीटंचाईच्या आलेल्या प्रस्तावाची माहिती तहसीलदार यांना तात्काळ देवून त्याची गरज लक्षात घेवून त्यावर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत़ या आदेशानुसार लातूर तालुक्यातील टंचाई कक्षाकडे २३ गावे, ४ वाड्यातून विहिरी, बोअरच्या अधिग्रहाणाची मागणी आली आहे़ पण प्रत्यक्षात १४ गावातून १८ प्रस्तांवाची मागणी आली आहे़ यातील १२ गावातील १६ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत़ औसा तालुक्यातील १९ गावातून ४० विहीर, बोअरचे अधिग्रहणाचे मागणी प्रस्ताव आले आहे़ यातील ५ गावचे ७ विहीर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यातील १५ गावांमधून, १ वाडीमधून ४२ विहीर, बोअर अधिग्रहणाचे मागणी करण्यात आली आहे.४शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांमधून ९ विहीर, बोअरच्या अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ यातील ४ गावातील ६ अधिग्रहण प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे़ देवणी तालुक्यातील १ गावांमधून ३ विहीर, बोअरची मागणी करण्यात आली आहे, पण प्रस्ताव एकही आला नाही़ जळकोट तालुक्यातील ३ गावामधून ३ विहिर, बोअर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ यातील १ गावातील १ विहिर अधिग्रहणाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे़ अशा प्रकारे जिल्ह्यातील २० गावे व १ वाडीतील २९ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़४निलंगा तालुक्यात २ गावातील ५ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या मागणी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे़ रेणापूर तालुक्यतील १० गावामधून, १० वाड्यांमधून ३३ विहिर, बोअर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ ८ गावे, २ वाड्यामधील १८ विहिर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ अहमदपूर तालुक्यातील १४ गाव, ९ वाड्यांमधून २५ विहिर, बोअर अधिग्रहणाचे मागणी क रण्यात आली आहे़ यातील ७ गावे, ७ वाड्यांच्या १४ अधिग्रहणाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे़ ४चाकूर तालुका आणि उदगीर तालुक्यातील विहिर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले नाहीत़ टंचाई कक्षाकडे आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करुन त्यांना तत्काळ पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता व्ही़ बी़ चव्हाण यांनी दिली आहे़ प्रस्ताव आला की त्याची पडताळणी तात्काळ होते, असेही ते म्हणाले.