शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत ७० कोटींची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली ...

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना फक्त २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी अपेक्षित असताना केवळ ५ कोटी ५० लाख रुपये मिळाले. त्यामुळे अत्यावश्यक कामे, दैनंदिन खर्चावर मर्यादा येत आहेत. कोरोना संसर्गापूर्वी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था होती. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांची रक्कम तब्बल २५० कोटींवर गेली होती.

महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मागील दीड वर्षांपासून आर्थिक नियोजन सुरू आहे. नागरिक मालमत्ता कर, पाणीपट्टी भरायला तयार नाहीत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मालमत्ता करापोटी ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित होती; पण ६ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. सरासरी ४० टक्केच वसुली झाली आहे. महापालिकेने शहरातील अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. त्यापोटी ३ महिन्यांत ८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; पण केवळ ५० लाख रुपये जमा झाले. मनपाचा दैनंदिन खर्च जशास तसा आहे. अत्यावश्‍यक कामांसाठी उत्पन्नातील ६५ टक्के रक्कम खर्च होते; पण केवळ ४० टक्केच वसुली झाल्यामुळे आर्थिक गणित बिघडत आहे.

---------

तीन महिन्यांतील वसुली

उद्दिष्ट-वसुली (आकडे कोटींत)

मालमत्ता कर -६०-२७

पाणीपट्टी ३६- ०६.५०

मालमत्ता विभाग ०८ - ००.५०

-----------

दरमहा अत्यावश्‍यक खर्च (आकडे कोटींत)

कर्मचाऱ्यांचे वेतन-२२

पाणीपुरवठा वीज बिल-०४

पथदिवे-००.७५ लाख

कर्जाचे हप्ते-०१

एसटीपी प्लांट वीज बिल-००.७० लाख

कर्मचारी पेन्शन-०३

शिक्षण विभाग-०२

बचत गट कर्मचारी वेतन-०१