शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चा

By admin | Updated: May 15, 2014 00:05 IST

अंबाजोगाई: दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला

अंबाजोगाई: महाराष्ट्रात दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना देण्यात आले. अण्णा भाऊ साठे युवा आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये रोज दलितांवर अन्याय, अत्याचाराची मालिका चालू आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. शासन व प्रशासन ह्या घटनांकडे लक्ष देत नाही. फक्त फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांची नावे घ्यायची व सत्ता हस्तगत करायची व जातीवादाला खतपाणी घालायचे काम करीत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राची परिवर्तनवादी जनता सहन करणार नाही. दलितांवरील अत्याचार रोखण्यास शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. यासाठी खालील मागण्या घेऊन राज्यातील दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मागण्या दत्ता काळेच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करणे. दत्ता काळे, संजय गायकवाड, नितीन आगे, उमेश आगळे, मनोज कसाब यांच्या खुनांचा तपास सी.आय.डी. किंवा सी.बी.आय. मार्फत करण्यात यावा. वरील सर्व पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करा. अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जळवबन येथील वैरागे या तरुणीस आत्महत्या करण्यास भाग पाडणार्‍या आरोपींवर कडक कारवाई करावी. नगर व बीड जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहिर करण्यात यावा. त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी. या मागण्या पूर्ण करण्यास शासन व प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर संघटना रस्त्यावर उतरेस असा इशारा देण्यात आला. या मोर्चात दशरत कांबळे, अविनाश हजारे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालके, बळीराम उपाडे, अमोल काळे, समाधान काळुंके, अ‍ॅड. लोखंडे, पांडुरंग जोगदंड, हिरामण पाटोळे, जोगदंड मारुती, महादेव हजारे, दत्ता उपाडे, संतोष पारधे, अमोल वाघमारे, अर्चना वायदंडे, मनीषा काळे, कमलाकर जोगदंड, संतोष पारधे, अमोल खरात, मुन्ना सरवदे, लक्ष्मण कांबळे, आदींची उपस्थिती होती. या मोर्चाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (वार्ताहर)