शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती शक्य

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही.

कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही. त्यांच्याविषयीची द्वेषभावना अजून संपलेली नाही. आपल्या देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे सर्व जग मान्य करीत असताना आपल्या देशातील जनता मात्र समजण्यास तयार नाही. बाबासाहेबांच्या वाङ्मयाचा नवयुवक जसजसा अभ्यास करतील तसतशी विचारांची क्रांती होईल. देश बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती करू शकतो अन्यथा नाही, असा दावा भीमपत्रिकेचे संपादक डॉ. एल. आर. बाली यांनी केला. मक्रणपूर येथे आयोजित मक्रणपूर परिषद व जयभीम दिन अमृतमहोत्सवी सांगता समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विचारांच्या क्रांतीपीठावर डॉ. अनिल कटारे, बलभीमराज गोरे, चंद्रभान पारखे, भैयाजी खैरकर, डॉ. अरविंद गायकवाड, रतन पंडागळे, उषा भालेराव, डॉ. प्रतिभा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. मक्रणपूर परिषद व जयभीम दिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभात क्रांती घडविणाऱ्या विचारांची मशाल प्रज्वलित झाली. वेगवेगळ्या वक्त्यांनी मांडलेल्या विचारांनी मुग्ध झालेले श्रोते एकचित्ताने विचार ऐकत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सुरुवातीला मक्रणपूर परिषदेवर आधारित ‘डॉक्युमेंटरी’ दाखविण्यात आली. त्यानंतर गौतम बुद्धांच्या मूर्तीस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर जयभीम फलकाचे अनावरण डॉ. एल.आर. बाली यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. डॉ. एल. आर. बाली यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. बुद्धप्रिय कबीर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अनिल कटारे, भैयाजी खैरकर यांची आंबेडकरी विचारांची प्रगल्भता सांगणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण मोरे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना युवकांनी इतिहासाचा बोध घेऊन चळवळीस चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.