शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

अवघ्या सतरा दिवसांत निघतेय तुतीचे उत्पादन...!

By admin | Updated: December 28, 2016 00:06 IST

जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे.

जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शेतकरी अवलंब करीत असून, त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. यावर्षांत जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघून शेतकऱ्यांनी सुमारे ४ कोटींचे उत्पादन मिळविले आहे. राज्यात मराठवाडा उत्पादनात द्वितीय स्थानी असून, विदर्भात जालना जिल्ह्याच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. जिल्ह्यात ९४१ एकरवर ८९१ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली होती. जुन्या लागवड पद्धतीऐवजी नवीन पद्धत आली आहे. आता शेतकऱ्यांना थेट तुतीच्या अळ्या देण्यात येतात. यातून पंधरा ते सतरा दिवसांत हे उत्पादन निघते. तुतीपासून रेशीमचा भाव प्रति क्विंटल ३० ते ४० हजार क्विंटल दरम्यान आहे. १०१ मेट्रिक टन पाहता याद्वारे शेतकऱ्यांना तब्ब्ल चार कोटी रूपयांचे उत्पादन निघाल्याची माहिती विभागीय रेशी उपसंचालक दिलीप हके यांनी सांगितले. राज्यात तुती लागवड ८३३६ एकर एवढी होती. त्यापैकी ४०९८ एकर क्षेत्र मराठवाड्यात आहे. क्षेत्राचा विचार करता मराठवाड्यात ३४४ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन झाले. तर जालना जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघाले आहे. नवीन शेतकऱ्यांना लागवडीसाठी जानेवारीपासून शेतकऱ्यांनी तयारी करावी. नवीन तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे हके यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला एक चांगला पर्याय म्हणून रेशीम शेती असून, याचा जिल्ह्यातील शेतकरी फायदा घेत आहे. इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे वळावे म्हणून रेशीम कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)