शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अंतरपिकातून घेतले लाखोंचे उत्पादन

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

विलास भोसले, पाटोदा दरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.

विलास भोसले, पाटोदादरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.नैसर्गिक दुष्काळापेक्षा अडाणीपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाला शेतकऱ्याला हालअपेष्टा, मानहानीस तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाटोदा येथील चक्रपाणी यांनी चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. घरची परिस्थिती व्यवस्थित असतानाही केवळ आवडीपोटी चक्रपाणी यांनी शेती व्यवसायात पदार्पण केले. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनची पदविका त्यांनी घेतलेली आहे तर वडील अ‍ॅड. लक्ष्मण जाधव हे सभापती म्हणून राहिलेले आहेत. चक्रपाणी जाधव यांनी १९९३ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र शिकून गुलामगिरीची नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. एक हेक्टर चिकूच्या बागेतच सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न गतवर्षी घेतले आहे. तर यंदा पाणी कमी झाल्याने हाताश न होता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. चिकूच्या बागेतच अंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली असून, त्यामधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. गारपिटीमुळे यंदा चिकूची बाग उद्ध्वस्त झाली मात्र धीर न सोडता कांदा उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरविले व त्यानुसार चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेतले. पिकांना खर्चिक व रासायनिक खाते वापरण्यापेक्षा कंपोस्ट, गांडूळ खताची निर्मिती करुन कांदा पिकाला दिली. तर विहिरीचे पुनर्भरण करुन नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला. बेरोजगारांनी नोकरीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने व्यवसाय केल्यास तो फायद्यात राहील. शेतकऱ्यांनी अडाणीपणा सोडून प्रशासनाच्या योजनंचा लाभ घेण्याचे आवाहन चक्रपाणी जाधव यांनी केले.