शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

अंतरपिकातून घेतले लाखोंचे उत्पादन

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

विलास भोसले, पाटोदा दरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.

विलास भोसले, पाटोदादरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.नैसर्गिक दुष्काळापेक्षा अडाणीपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाला शेतकऱ्याला हालअपेष्टा, मानहानीस तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाटोदा येथील चक्रपाणी यांनी चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. घरची परिस्थिती व्यवस्थित असतानाही केवळ आवडीपोटी चक्रपाणी यांनी शेती व्यवसायात पदार्पण केले. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनची पदविका त्यांनी घेतलेली आहे तर वडील अ‍ॅड. लक्ष्मण जाधव हे सभापती म्हणून राहिलेले आहेत. चक्रपाणी जाधव यांनी १९९३ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र शिकून गुलामगिरीची नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. एक हेक्टर चिकूच्या बागेतच सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न गतवर्षी घेतले आहे. तर यंदा पाणी कमी झाल्याने हाताश न होता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. चिकूच्या बागेतच अंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली असून, त्यामधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. गारपिटीमुळे यंदा चिकूची बाग उद्ध्वस्त झाली मात्र धीर न सोडता कांदा उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरविले व त्यानुसार चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेतले. पिकांना खर्चिक व रासायनिक खाते वापरण्यापेक्षा कंपोस्ट, गांडूळ खताची निर्मिती करुन कांदा पिकाला दिली. तर विहिरीचे पुनर्भरण करुन नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला. बेरोजगारांनी नोकरीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने व्यवसाय केल्यास तो फायद्यात राहील. शेतकऱ्यांनी अडाणीपणा सोडून प्रशासनाच्या योजनंचा लाभ घेण्याचे आवाहन चक्रपाणी जाधव यांनी केले.