शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

नगर पंचायतींची प्रक्रिया रखडलेलीच

By admin | Updated: December 22, 2014 23:50 IST

जालना : जिल्ह्यातील चार तालुकास्थाने असूनही तेथे नगर पालिका नाही. गावाचा विस्तार होत आहे. परंतु विकास कामे करताना अनेक अडचणी येत आहेत

जालना : जिल्ह्यातील चार तालुकास्थाने असूनही तेथे नगर पालिका नाही. गावाचा विस्तार होत आहे. परंतु विकास कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे या तालुकास्थानांना नगर विकास विभागाने नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय आठ ते नऊ महिन्यांपूर्वी घेतला. एवढा कालावधी उलटूनही ही प्रक्रिया जैसे थेच आहे. दर्जा कधी मिळणार याची प्रतीक्षा या तालुक्यांना लागली आहे. मंठा, जाफराबाद, घनसावंगी व बदनापूर हे चार तालुके आहेत. तालुक्यात नगर पालिका वगळता अन्य सर्व शासकीय कार्यालये येथे आहेत. फक्त पालिका नसल्याने ग्रामपंचायतीच्या मर्यादित अधिकारावरच कसबशी विकास कामे होत आहेत. नगरपंचायत झाल्यास या तालुकास्थानांचा चौफेर विकास होण्यास मदत होणार आहे. असे असले तरी आठ ते दहा महिने उलटूनही नगर विकास विभागाच्या लालफितीच्या कारभारात ही पंचायत अडकल्याची भावना या तालुक्यांतून व्यक्त होत आहे.काही महिन्यांपूर्वी या नगर पंचायतींसाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. हरकतींचे नंतर काय झाले, निर्णय कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. नगर पंचायतींचा दर्जा ग्रामपंचायतींपेक्षा मोठा असतो. विकास कामे होण्यासही मदत मिळते. यात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सक्षमता, शहर परिसराचा विकास, पथदिवे तसेच प्रत्येक प्रभागात अंतर्गत रस्ते, प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा, कचरा व सांडपाण्याची व्यवस्था लावणे आदी कामांसाठी विशेष निधी मिळविता येतो. विशेष म्हणजे चार तालुकास्थाने मोठे व्यापारी केंद्रे आहेत. असे असले तरी ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. नगर पालिका दूरच पण नगर पंचायतींसाठी या गावांना अनेक वर्षे झगडावे लागले. आता या चार तालुकास्थांना पंचायतींचा दर्जा मिळाला असला तरी या पंचायती प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)४जाफराबाद, बदनापूर, मंठा व घनसांवगी गावांना नगर पंचायतींचा दर्जा मिळणार आहे. ग्रामंपंचायती निकाली निघूल पंचायत होणार असल्याने याद्वारे विकास होण्यास मदत होणार आहे. नगर विकास विभाग पंचायतींचा निर्णय कधी घेणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. नवीन वर्षात या ग्रामपंचायतींना पंचायतींचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.४या चार तालुकास्थानच्या नगरपंचायतींबाबत निर्णय शासन घेणार आहे. शासनाच्या आदेश येताच पुढील प्रक्रिया पार पडले, अशी माहिती जिल्हाधिकारी रंगानायक यांनी दिली.