शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:05 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : एककाळ असा होता की, गूळ खाणारे गरीब व साखर खाणारे श्रीमंत असे समजले जात होते. ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : एककाळ असा होता की, गूळ खाणारे गरीब व साखर खाणारे श्रीमंत असे समजले जात होते. मात्र, आता साखरेच्या

अतिवापरा दुष्परिणाम समोर आल्याने आता अनेकांचा गुळाचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे. चहापासून ते पुरणपोळीपर्यंत गुळाचा वापर होऊ लागला आहे. यामुळे पुन्हा गुळाला भाव चढला आहे.

बाजारात एका किराणा दुकानादारांकडे पूर्वी दररोज गूळ २० किलो, तर साखर ८० किलो विकत असे. मात्र, आता ४० ते ५० किलो गूळ व ५० किलो साखर विकली जाते. हा बदल मागील काही वर्षांत झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. मात्र, होलसेल व्यापाऱ्यांच्या मते शहरात दररोज २५ ते ३० टन साखर व १० ते १२ टन गुळाची विक्री होत आहे. गुळाची चहा टपरीवाल्यांकडून जास्त मागणी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

पूर्वीपासून साखरेपेक्षा गूळ जास्त भावात विकल्या जातो. आजही दोन्हीच्या किमतीत किलोमागे दहा रुपयांची तफावत दिसून येते.

चौकट

वर्ष साखर (प्रति किलो) गूळ

२००० १८ ते २० रु २० ते २२ रु.

२००५ ३१ ते ३२ रु ४० ते ४२ रु

२०१० ३७ ते ३८ रु ४६ ते ५० रु.

२०२० ३६ ते ३७ रु ४४ ते ४५ रु.

२०२१ ३४ ते ३५ रु ४४ ते ४५ रु.

-्-------------------------------------

(प्रतिक्रिया)

गुळाची वाढतेय मागणी

मागील दहा वर्षांत साखरेपेक्षा गुळाला मागणी वाढत आहे. साखरेची मागणी त्यातुलनेत स्थिर आहे. गुळाला घरगुतीसोबत चहा व्यावसायिकांकडून आता जास्त मागणी होत आहे.

श्रीकांत खटोड, किराणा व्यापारी

--

गुळाची विक्री ३० टक्क्यांनी वाढली

आम्ही पूर्वी दररोज २० किलो गुळ तर ८० किलो साखर विकत असत. पण मागील काही वर्षांत गुळाची मागणी ३० टक्क्यांनी वाढली व सध्या दररोज ५० किलो गूळ तर ४० ते ५० किलो साखर विकतो.

उमेश वखरे, किराणा व्यापारी

----

ग्रामीण भागात साखरेलाच डिमांड

बजाजनगर आसपासच्या परिसरात व ग्रामीण भागात गुळाला मागणी वाढली आहे, पण अजूनही साखरेलाच मागणी जास्त आहे. माझ्या किराणा दुकानातून दररोज ३० किलो गूळ, तर १०० किलो साखर विक्री होते. यावरून अंदाज लावू शकता.

मदन छापरवाल, किराणा व्यापारी (बजाजनगर)

-----

गूळ चहा बनले स्टेटस

साखरेचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर अनेकजण गुळाकडे वळाले. आता गुळाचा चहा स्टेटस बनले आहे. घरात आलेले पाहुणे साखर नको गुळाचा चहा करा, असे आवर्जून सांगतात.

लालचंद जव्हेरी ज्येष्ठ नागरिक (खाराकुँआ)

---

चौकट

अतिरेक नुकसानकारकच

साखर असो वा गूळ सेवनाचा अतिरेक झाल्यावर ते शरीरासाठी नुकसानदायकच ठरते. मात्र, गुळात मॅग्नेशिअम,कॉपर आणि लोह अधिक असते. गूळ प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारते. थकवा कमी होतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व साखरेला उत्तम पर्याय म्हणून गुळाकडे पाहिले जाते. जेवनानंतर गुळाचा खडा खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.

डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ