शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : माहेरून दहा लाख रुपये आणावे, याकरिता पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन ...

औरंगाबाद : माहेरून दहा लाख रुपये आणावे, याकरिता पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी न्यू हनुमाननगरात घडली. या घटनेनंतर विवाहितेच्या वडिलांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि नणंदा अशा सहा जणांंविरोधात हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

अमोल अण्णासाहेब त्रिभुवन, सासरा अण्णासाहेब, सासू सिंधूबाई, नणंद भाग्यश्री मुन्ना महांकाळे (रा. भारतनगर, गारखेडा), नणंद अंजू आणि जयश्री अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पूजा अमोल त्रिभुवन (२०,रा. न्यू हनुमाननगर)असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पूजा आणि अमोल यांचा गतवर्षी १४ जून रोजी महांकाळ वडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे विवाह झाला. दीड तोळ्याची अंगठी आणि ३५ हजार रुपये हुंडा पूजाच्या आईवडिलांनी आरोपींना दिला होता. लग्नानंतर तीन महिने चांगले वागविल्यावर आरोपींनी काहीतरी व्यवसाय करण्यासाठी अथवा प्लाॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तुझ्या वडिलांकडे चांगली शेती आहे, तुझ्या वाट्याची शेती विकून पैसे देण्यास सांग, असे म्हणून त्यांनी तिचा छळ सुरू केला. ही बाब पूजाने आई, वडील आणि भावाला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून तिला त्रास सुरूच होता. यामुळे पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते तिला माहेरी घेऊन गेले होते. तेव्हा आरोपींनी यापुढे त्रास देणार नाही, असे सांगून ते तिला नांदायला घेऊन आले. येथे आणल्यावर त्यांनी तिचा पुन्हा छळ सुरू केला. पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. तिच्या वडिलांनीही आरोपींना पैसे देण्यासाठी शेती विकण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्रास वाढतच असल्याने सोमवारी सकाळी पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच तिच्या पतीने तिला घाटीत दाखल केले. तिचा पतीशिवाय अन्य आरोपी घराला कुलूप लावून पळून गेले होते. याविषयी पूजाचे वडील सुभाष यादव महांकाळे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींच्या अटकेसाठी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.