शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

मनपा उपायुक्तपदी प्रतिभा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:04 IST

कामगार शक्ती संघटनेतर्फे धरणे आंदोलन औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...

कामगार शक्ती संघटनेतर्फे धरणे आंदोलन

औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी कामगार शक्ती संघटनेतर्फे मनपा मुख्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सिडको हडकोत बचत गटामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. माळी कामगारांचे वेतन महाराणा एजन्सीकडे थकीत आहे. पीएफ, ईएसआयचे चलन कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. यांत्रिकीमधील कामगारांचे वेतन थकीत आहे. फवारणी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही कायम आहे. रेड्डी कंपनी कामगारांना किमान वेतन देत नाही. यावेळी संस्थापक अध्यक्ष गौतम खरात, भास्कर आढावे, शाम शिरसाठ, राजेंद्र नवगिरे आदी उपस्थित होते.

नव्याने वॉर्ड रचना करण्याची मागणी

औरंगाबाद : मार्च २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार होती. कोरोना संसर्गामुळे निवडणुका अगोदर पुढे ढकलण्यात आल्या. नंतर वॉर्ड रचनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. भाजपने शहरातील वॉर्डांची रचना आपल्या सोयीनुसार केली होती. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, हा या मागचा हेतू होता. समतानगर-कोटला कॉलनी वॉर्डाची रचनाही अशाच पद्धतीने केली आहे. त्यामुळे वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करावी अशी मागणी माजी नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरेशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.