शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

फुलंब्री तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:02 IST

फुलंब्री : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे १९ कोटींची बिले थकली आहेत. त्यामुळे महावितरणने वीज बिल थकीत केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा ...

फुलंब्री : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे १९ कोटींची बिले थकली आहेत. त्यामुळे महावितरणने वीज बिल थकीत केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपूर्वीच या ५६ गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने कापला आहे. त्यामुळे गावागावांत पाण्याची बोंब उठली असून, ग्रामपंचायतअंतर्गत असलेले पथदिवे बंद पडले आहेत.

फुलंब्री तालुक्यात एकूण ६८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५६ ग्रामपंचायतींकडे १९ कोटींची थकबाकी आहे. महावितरणकडून गेल्या काही वर्षांपासून वीज बिल भरण्यासाठी अनेक वेळा सवलती देण्यात आल्या. या बिलातील रक्कम कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या संधीदेखील देण्यात आल्या; पण याकडे एकाही ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही. परिणामी, दोन दिवसांपूर्वी महावितरणने कारवाईचा बडगा उगारत थकबाकी गावांतील वीजपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले आहे.

-----

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींत पाणीपुरवठा करणारी ११८ कनेक्शन्स आहेत, तर १०४ पथदिवे कनेक्शन्सचा समावेश आहे. यात पाणीपुरवठ्याचे ७ कोटी व पथदिव्यांची १२ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. ही थकबाकी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. विजेचा वापर करायचा; पण बिल भरण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायचा नाही.

----

ग्रामपंचायतीकडून ऐनवेळेवर जुळवाजुळव

पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा अचानक कापला गेल्याने अनेक गावांतील ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत. ऐनवेळेवर धावपळ सुरू झाली. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. गावात पथदिवे बंद पडल्याने सर्वत्र अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे, तर थकबाकी भरण्यासाठी काही ठिकाणी जुळवाजुळव सुरू झाली होती.

---

कोट

गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात ग्राहकांना आम्ही अहोरात्र सुरळीत वीजपुरवठा दिला. वीज कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता कामे केलीत; पण तरीदेखील ग्राहक बिल भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. विशेषकरून तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे सर्वाधिक थकबाकी असल्याने महावितरण अडचणीत आले आहे. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.

-अरुण गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

------

कोट

ग्रामपंचायतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी आहे; पण वीजपुरवठा एकदम बंद करणे हा त्याला योग्य पर्याय नाही. कोरोना परिस्थितीत ग्रामपंचायतीकडे पूर्ण बिल भरण्याइतके पैसे नाहीत. जानेवारी २०२१ पासूनचे बिल वेगळे करून द्यावे, जेणेकरून बिल भरणा करता येईल.

-किशोर चव्हाण, उपसरपंच, किनगाव ग्रा.पं.