शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आरोग्य विभागाचे पोस्टमॉर्टेम

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ग्रामीण भागात बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा पाढा वाचत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कुठे दिवसाच आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून डॉक्टर-कर्मचारी गायब झाल्याचे, तर कुठे बायोमेट्रिक मशीन बंद दाखवून रजिस्टरवरच हजेरी नोंदविली जात असल्याची धक्कादायक बाब सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासनाने दोन सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. स्थायी समितीची बैठक जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनुपालन वाचन सुरू असताना आरोग्य केंद्रातील कर्मचारी संबंधित गावात राहत नसल्याचा मुद्या उपस्थित झाला. त्यावर दीपकसिंग राजपूत यांनी लाडगाव आणि लोणी खुर्द येथील बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतर चार दिवसांतच ते बंद पडल्याचे सांगितले. मशीन मुद्दाम बंद पाडून एप्रिलपासून जुन्याच पद्धतीने हजेरी नोंदवून पगार काढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रजिस्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची वेळ एकच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तालुका वाटपाचे आदेश काय गोपनीय काढले होते का, असा खोचक सवालही केला. तालुका आरोग्य अधिकारी यापुढे प्रत्येक बैठकीला हजर राहिले पाहिजेत, असेही बैठकीत सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बैठकीत नुसते पुतळ्यासारखे उभे राहत जाऊ नका, अशा शब्दांत फटकारले.जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी किती आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही. मनोहर गवई, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोटे आदी सदस्यांनीही चर्चेत सहभाग घेतला. अंधारीच्या आरोग्य केंद्राला कुलूपज्ञानेश्वर मोटे यांनी अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय उपस्थित केला. या ठिकाणी नेहमीच कर्मचारी गैरहजर राहतात, अशी तक्रार त्यांनी केली. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी लगेच गावातील ग्रामपंचायत सदस्याला फोन लावून आरोग्य केंद्रावर पाठविले.बैठक सुरू असतानाच संबंधिताने आरोग्य केंद्राला कुलूप असल्याचा निरोप फोनवर दिला. तेव्हा दुपारचे ३ वाजले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी या केंद्रावरील सर्वांचीच बिनपगारी सुटी टाकण्याचे आदेश दिले. बायोमेट्रिक कशासाठी बसविले, त्यावर नोंद होत नसेल तर पगार काढता कसा, तालुक्यांची तपासणी होत नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी उपस्थितीत दोन सहजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तुमच्याकडे कोणकोणते तालुके आहेत, अशी विचारणा केली. या प्रश्नाचे उत्तर संबंधितांना देता आले नाही. सहजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर आणि डॉ. गोविंद चौधरी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश सीईओ चौधरी यांनी दिले.