शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 00:55 IST

कळंब अलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे.

बालाजी आडसूळ कळंबअलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ प्रमुख साखर कारखान्यांपैकी केवळ दोनच कारखान्यांचे ‘बॉयलर’ सद्यस्थितीत अग्नीप्रदीपन झाले असून, इतर व्यवस्थापनाचा यंदा कल 'क्रशींग' बंद ठेवण्याकडेच दिसून येत आहे. उपलब्ध ऊसाचाही बेण्यासाठीच अधिक वापर होत असल्याने गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांनाही गेटकेन ऊसावर अवलंबून रहावे लागणार आहे. एकूणच या स्थितीचा जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. तीन दशकांपूर्वी तेरणासारख्या कारखान्याचा अपवाद वगळता साखर उद्योगाच्या गणतीमध्ये जिल्ह्याचा नामोल्लेख होत नव्हता. सिंचनाची मर्यादित साधने, प्रचलित पीक पद्धती, मोजकेच एक-दोन कारखाने यामुळे उसाचे क्षेत्र जेमतेमच असायचे. यातही तेरणापट्टा वगळता इतर भागात ऊसाची गोडी गुळापुरतीच मर्यादीत रहायची. परंतु, नव्वदच्या दशकात जिल्ह्यातील पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल झाले. अनेक नवी जलसाठवण स्त्रोत अस्तित्वात आली. वैयक्तिक विहिर व बोअरवेल्सची संख्या वाढत गेली. जशी साधनं वाढली तशी लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसशेतीची बागायती हवा डोक्यात शिरकाव करू लागली. यातूनच जिल्हयात ऊस शेतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे तेरणा, तुळजाभवानी नंतर क्रमाक्रमाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊसशेतीला समांतर साखर कारखानदारी बहरू लागली. यामुळेच गत दहा वर्षात राज्यतील साखर कारखानदारीच्या आलेखात जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान नोंदले जावू लागले. या साखर कारखानदारीचा ग्रामीण भागातील लोकजीवनावर सुपरिणाम तर झालाच शिवाय अर्थकारणासही मोठा हातभार लागला आहे.असे असताना जिल्ह्यात २०१० नंतर पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. अत्यल्प पावसाने नदी, नाले अपवादानेच वाहिले. या स्थितीचा पाणीसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होवून जिल्ह्यात बहरलेल्या ऊसशेतीला नकळत उतरती कळा लागत गेली. जवळपास साठ हजार हेक्टरच्या पुढे सरकलेल्या ऊस क्षेत्रात २०१३ पासून दरवर्षी घट होत चालली. यातच २०१४-१५ मध्ये यात लक्षणीय घट झाली. साल २०१५-१६ मध्ये तर गावोगावी पिण्याचे पाणी उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे तोही अल्प स्वरूपात ऊस शिल्लक राहिला आहे. बागायतदारांवरही तुळशीच्या लग्नाला ऊस शोधण्याची वेळ आली होती. एकीकडे कारखानदारी विकसित होत असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाने ऊसशेती संकटात सापडत चालली होती. २०११ ते २०१५ या पाच वर्षातील असमाधानकारक पर्जन्याचा परिणाम यंदा दिसून आला असून, सुस्थितीत असलेल्या सर्वच कारखान्यांपुढे ऊसटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी स्थितीमुळे नॅचरलच्या कार्यक्षेत्रातही जवळपास दहा हजार हेक्टर ऊसाची तूट आहे. अशीच समस्या इतर कारखान्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी असली तरी नॅचरल, शंभू महादेव, भैरवनाथ, लोकमंगल, कंचेश्वर, भीमाशंकर हे खाजगी, तर डॉ. आंबेडकर, विठ्ठलसाई, शिवशक्ती इ. दहा कारखाने गाळपाच्या शर्यतीत मोठ्या ताकदीने उतरू शकत होते. परंतु ऊसटंचाईचा प्रश्न असल्याने व गेटकेन ऊसाचीही शाश्वती नसल्याने यातील केवळ पाच कारखान्यांनीच साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळप हंगाम २०१६-१७ साठी तयारी असल्याचे कळविल्याचे नांदेड येथील सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यात शंभू महादेव (कळंब), विठ्ठलसाई (मुरूम), कंचेश्वर (तुळजापूर) व लोकमंगल (लोहारा) यानी स्वारस्य दाखवले असले तरी प्रत्यक्षात ‘बॉयलर’ पेटवून ‘क्रशींग’ची तयारी केवळ विठ्ठलसाई व शंभू महादेवनेच सुरू केली आहे. यंत्रणांची जुळवाजुळव, उसाचे नियोजन यात या दोन्ही कारखान्याचे व्यवस्थापन सध्या व्यस्त आहे.