शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 00:55 IST

कळंब अलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे.

बालाजी आडसूळ कळंबअलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ प्रमुख साखर कारखान्यांपैकी केवळ दोनच कारखान्यांचे ‘बॉयलर’ सद्यस्थितीत अग्नीप्रदीपन झाले असून, इतर व्यवस्थापनाचा यंदा कल 'क्रशींग' बंद ठेवण्याकडेच दिसून येत आहे. उपलब्ध ऊसाचाही बेण्यासाठीच अधिक वापर होत असल्याने गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांनाही गेटकेन ऊसावर अवलंबून रहावे लागणार आहे. एकूणच या स्थितीचा जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. तीन दशकांपूर्वी तेरणासारख्या कारखान्याचा अपवाद वगळता साखर उद्योगाच्या गणतीमध्ये जिल्ह्याचा नामोल्लेख होत नव्हता. सिंचनाची मर्यादित साधने, प्रचलित पीक पद्धती, मोजकेच एक-दोन कारखाने यामुळे उसाचे क्षेत्र जेमतेमच असायचे. यातही तेरणापट्टा वगळता इतर भागात ऊसाची गोडी गुळापुरतीच मर्यादीत रहायची. परंतु, नव्वदच्या दशकात जिल्ह्यातील पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल झाले. अनेक नवी जलसाठवण स्त्रोत अस्तित्वात आली. वैयक्तिक विहिर व बोअरवेल्सची संख्या वाढत गेली. जशी साधनं वाढली तशी लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसशेतीची बागायती हवा डोक्यात शिरकाव करू लागली. यातूनच जिल्हयात ऊस शेतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे तेरणा, तुळजाभवानी नंतर क्रमाक्रमाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊसशेतीला समांतर साखर कारखानदारी बहरू लागली. यामुळेच गत दहा वर्षात राज्यतील साखर कारखानदारीच्या आलेखात जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान नोंदले जावू लागले. या साखर कारखानदारीचा ग्रामीण भागातील लोकजीवनावर सुपरिणाम तर झालाच शिवाय अर्थकारणासही मोठा हातभार लागला आहे.असे असताना जिल्ह्यात २०१० नंतर पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. अत्यल्प पावसाने नदी, नाले अपवादानेच वाहिले. या स्थितीचा पाणीसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होवून जिल्ह्यात बहरलेल्या ऊसशेतीला नकळत उतरती कळा लागत गेली. जवळपास साठ हजार हेक्टरच्या पुढे सरकलेल्या ऊस क्षेत्रात २०१३ पासून दरवर्षी घट होत चालली. यातच २०१४-१५ मध्ये यात लक्षणीय घट झाली. साल २०१५-१६ मध्ये तर गावोगावी पिण्याचे पाणी उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे तोही अल्प स्वरूपात ऊस शिल्लक राहिला आहे. बागायतदारांवरही तुळशीच्या लग्नाला ऊस शोधण्याची वेळ आली होती. एकीकडे कारखानदारी विकसित होत असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाने ऊसशेती संकटात सापडत चालली होती. २०११ ते २०१५ या पाच वर्षातील असमाधानकारक पर्जन्याचा परिणाम यंदा दिसून आला असून, सुस्थितीत असलेल्या सर्वच कारखान्यांपुढे ऊसटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी स्थितीमुळे नॅचरलच्या कार्यक्षेत्रातही जवळपास दहा हजार हेक्टर ऊसाची तूट आहे. अशीच समस्या इतर कारखान्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी असली तरी नॅचरल, शंभू महादेव, भैरवनाथ, लोकमंगल, कंचेश्वर, भीमाशंकर हे खाजगी, तर डॉ. आंबेडकर, विठ्ठलसाई, शिवशक्ती इ. दहा कारखाने गाळपाच्या शर्यतीत मोठ्या ताकदीने उतरू शकत होते. परंतु ऊसटंचाईचा प्रश्न असल्याने व गेटकेन ऊसाचीही शाश्वती नसल्याने यातील केवळ पाच कारखान्यांनीच साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळप हंगाम २०१६-१७ साठी तयारी असल्याचे कळविल्याचे नांदेड येथील सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यात शंभू महादेव (कळंब), विठ्ठलसाई (मुरूम), कंचेश्वर (तुळजापूर) व लोकमंगल (लोहारा) यानी स्वारस्य दाखवले असले तरी प्रत्यक्षात ‘बॉयलर’ पेटवून ‘क्रशींग’ची तयारी केवळ विठ्ठलसाई व शंभू महादेवनेच सुरू केली आहे. यंत्रणांची जुळवाजुळव, उसाचे नियोजन यात या दोन्ही कारखान्याचे व्यवस्थापन सध्या व्यस्त आहे.