शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

औरंगाबादेतील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:25 IST

जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण: वाळूजमध्ये संघटनांची झाली बैठक

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. २०१५ साली उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी घेतला होता. ती कपात जून २०१६ पर्यंत कायम होती. यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाले नाही, त्यामुळे यावर्षी जायकवाडीत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आला नाही. जून २०१९ पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत असेल. त्यामुळे जूनअखेरपर्यंत उद्योगांची पाणीकपात करावी की न करावी, याबाबत निर्णय होण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू आहेत.जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन लाख शेतकरीदेखील अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो, तर उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच औरंगाबादला रोज २ द.ल.घ.मी. पाणी लागते. मृतजलसाठ्यातील पाणीउपसा सुरू केल्यानंतर साधारणत: दीड वर्ष पुरतो. सध्या धरणात जिवंत जलसाठा बऱ्या प्रमाणात आहे.तसेच जायकवाडीवरील धरणांतून पाणी येण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे उद्योगांची पाणीकपात टळणे शक्य आहे. जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा किती, पाण्याची मागणी किती, जिल्ह्यातील किती तलाव कोरडे पडले, जायकवाडीमध्ये उपलब्ध पाणीसाठा किती? गाळ किती? याचा आढावा अद्याप जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. प्रशासन जेव्हा आढावा घेईल, त्यावेळी कपातीबाबत निर्णय होईल.उद्योजकांचे विचारमंथनजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता टंचाईच्या अनुषंगाने आगामी काळात पाण्याचे नियोजन काटकसरीने होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येणे शक्य आहे. येत्या काळात उद्योगांची पाणीकपात न करता उद्योगांवर आधारित कामगारांचा पाणी नियोजनाशी निगडित यंत्रणांनी विचार करावा, असे मत उद्योजकांनी बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केले. मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (मासिआ) च्या वाळूज कार्यालयात झालेल्या बैठकीला सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, वाळूज औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष वसंत वाघमारे, मासिआचे अध्यक्ष किशोर राठी, हर्षवर्धन जैन आणि मनीष अग्रवाल यांची उपस्थिती होती.

 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी