शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:32 IST

नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़नांदेड विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. सुरूवातीच्या काळात नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी मिळत नसल्याच्या कारणाने टप्याटप्प्याने ह्या सेवा बंद करण्यात आल्या़दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण या योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात आली होती़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पाच विमानतळांचा समावेश केला होता. यात नांदेड विमानतळाचाही समावेश आहे़ या योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून नांदेड-हैदराबाद व नांदेड-मुंबई ट्रु जेट या विमान कंपनीला या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली़ केवळ नांदेड विमानतळावरून नांदेड -हैदराबाद उड्डाण योजनेतंर्गत ट्रु जेट या विमान कंपनीने २८ एप्रिल रोजी ही सेवा सुरू केली. यावेळी लवकरच मुंबई, दिल्ली, मोहाली विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ परंतु, हैदराबाद विमानसेवा सुरू होवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी नांदेड-मुंबई विमानसेवा उपलब्ध झाली नाही.दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड - अमृतसर या विमानसेवेसाठी एअरलायन्स या कंपनीच्या अधिकाºयांनी विमानतळाची पाहणी केली़ संबंधित अधिकाºयांनी रन वे (धावपट्टी) खराब झाल्यामुळे या ठिकाणाहून सेवा सुरू करता येणार नाही, यासाठी रन वे तत्काळ दुरूस्ती करावा, अशा सूचना दिल्या होत्या़ यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अर्जुन खोतकर, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रन वे ची दुरूस्ती करण्यासाठी विमानळच्या देखभालीची जबाबदारी असणाºया रिलायन्स कंपनीकडे पाठपुरावा केला होता.२९ आॅक्टोबरपासून रन वेच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम १५ दिवस चालणार असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत या विमानतळावरून विमानसेवा बंद राहणार आहे़