शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

ग्राहकांची केविलवाणी वणवण !

By admin | Updated: November 14, 2016 00:22 IST

उस्मानाबाद : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून उस्मानाबादकरांना पैशासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून ते आजतागायत उस्मानाबादकरांना पैशासाठी केविलवाणी धडपड करावी लागत असल्याचे चित्र शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. सुटीच्या दिवशीही म्हणजेच रविवारी बँका सुरु ठेवण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागली. असे असताना दुसरीकडे शहरातील थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० टक्क्यांपेक्षा अधिक एटीएमचे शटर डाऊन होते. त्यामुळे ज्या एटीएममध्ये पैसे होते तेथे ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.चलनामधून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खिशात पैसे असूनही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी शासनाने सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारीही बँका सुरु ठेवण्याबाबत फर्मान काढले होते. त्यानुसार आज शहरातील सर्व बँकांचे कामकाज सुरु होते. त्यामुळे शहरातील राष्ट्रीयकृत बँकासह खाजगी बँकामध्येही ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. कोणी नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा होते तर कोणी पैसे खात्यावर जमा करण्यासाठी आले होते. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्राहकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले. दरम्यान, एटीएमद्वारे प्रतिदिन दोन हजार रुपये काढता येणार आहेत. तसे शासनाकडूनही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांतील गर्दी पाहून थोड्याफार पैशांची गरज असणारे ग्राहक एटीएम गाठत आहेत. परंतु एटीएममधील चित्रही फारसे दिलासादायक नाही. शहरामध्ये राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांसह काही मल्टीस्टेट बँकांचे एटीएम आहेत. या एटीएमपैकी रविवारी जवळपास ६० टक्क्यापेक्षा अधिक एटीएमचे शटर डाऊन होते. काळामारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बँक आॅफ बडोदा शाखेचे एटीएम आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदरील एटीएमचे शटर बंद असल्याचे दिसून आले. हा परिसर मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. सदरील एटीएम सेवा बंद असल्याने नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. या एटीएमपासून काही अंतरावर असलेल्या मारवाडी गल्लीतील महाराष्ट्र बँकेचे एटीएमही बंद अवस्थेत होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना याचा फटका सोवावा लागला. बँक आॅफ इंडियाने याच भागात एटीएम सुरु केलेले आहे. मात्र याही एटीएमचे शटर डाऊन असल्याचे दिसून आले. एकूणच मुख्य बाजारपेठ असलेल्या या परिसरातील तिन्ही बँकांची एटीएम सेवा बंद ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. दरम्यान, बार्शी नाका परिसरातही विविध तीन बँकांकडून एटीएम सेवा पुरविली जाते. परंतु दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास या तीनपैकी केवळ अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम सुरु होते. त्यामुळे ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती. रांग रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. सेंट्रल बिल्डींग चौकासह बार्शी नाक्यावरही बहुतांश बँकांचे एटीएम आहेत. परंतु एक दोन एटीएम वगळता इतर एटीएमचे शटर डाऊन असल्याचे पहावयास मिळाले. बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर सकाळपासूनच बंद असल्याचे उपस्थित नागरिकांतून सांगण्यात आले. आयसीआयसीआय बँकेची एटीएम सेवा सुरु होती. यासोबतच अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोरही भली मोठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम सुरु असल्याने येथेही ग्राहकांची गर्दी प्रकर्षाने दिसून आली. दरम्यान, भानुनगर परिसरात महाराष्ट्र बँकेला लागूनच एटीएम आहे. पैसे काढण्यासाठी अनेक ग्राहक येथे येत होते. परंतु शटर बंद असल्याचे पाहून ग्राहकांना परतावे लागत होते. काही ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्याकडे विचारणा करत होते. परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षीत उत्तरे मिळत नव्हती. परिणामी संबंधित ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात होता. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास लागून असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँक परिसरातही ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे या बँक परिसरात असलेले सर्व एटीएम सुरु होते. बसस्थानक परिसरातही विविध बँकांचे एटीएम आहेत. येथे सातत्याने ग्राहकांची वर्दळ असते. परंतु ऐन अडचणीच्या काळात या ठिकाणचे केवळ आयसीआयसीआय या बँकेचेच एटीएम सुरु होते. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. शिवाजी चौकातही अ‍ॅक्सिस बँकेसोबत बँक आॅफ इंडियाचेही एटीएम आहे. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास उपरोक्त दोन्हीही एटीएम बंद अवस्थेत होते. त्यामुळे उपस्थित ग्राहकांतून नाराजी व्यक्त होताना दिसून आली. समतानगर परिसरातही जवळपास तीन एटीएम आहेत. यापैकी एचडीएफसी बँकेचे एटीएम दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरु होते. याठिकाणी ग्राहकांची लांब लचक रांग लागल्याचे पहावयास मिळाले. तर स्टेट बँकेची दोन्ही एटीएम बंद होते. एकूणच शहरातील विविध बँकांची एटीएम संख्या लक्षात घेता जवळपास ६० टक्क्यावर एटीएम दुपारच्या सुमारास बंद होते. त्यामुळे ग्राहक पैशासाठी एटीएमचे उंबरठे झिजवताना दिसून आले. दरम्यान, ग्रामीण भागात तर याहीपेक्षा विदारक परिस्थिती आहे. बँका तसेच एटीएमची संख्या कमी असल्याने ग्राहक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन एटीएममधून पैसे काढताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)