शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

सांडपाण्यावर डाळिंबाची बाग

By admin | Updated: January 20, 2015 01:27 IST

अंकुश वाघ ,आडूळ दुष्काळाने सर्वत्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गावागावात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. मात्र या दुष्काळातही शेती हिरवीगार कशी राहिल,

अंकुश वाघ ,आडूळदुष्काळाने सर्वत्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गावागावात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. मात्र या दुष्काळातही शेती हिरवीगार कशी राहिल, याची पुरेपूर काळजी आडूळ येथील युवक शेतकऱ्याने घेतली आहे. आडूळसह परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई असतानासुद्धा येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गावातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर साडेतीन एकरात डाळिंबाची बाग फुलविली आहे.आडूळ बु. येथील मनोज सुभाषराव वाघ या बारावी पास झालेल्या युवा शेतकऱ्याने सध्या पाणीटंचाईची भीषण दाहकता लक्षात घेऊन मागील सहा ते सात वर्षांपासून गावातून वाहून जाणारे सांडपाणी योग्य रीतीने गट क्र. २२ मध्ये असलेल्या ४० बाय ३० शेततळ्यात साठविले. त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे दररोज झाडांना पाणी देऊन ६२५ डाळिंबाची झाडे, तसेच मोसंबीची कलमे (पन्हेरी) आंतरपीक म्हणून टमाटे जोपासत आहेत.ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या या शेतकऱ्याने शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती व्यवसायावर भर दिला. त्यांनी आधुनिक पद्धतीने पाणी टंचाईवर मात करून शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचे काटकसरीने योग्य नियोजन केल्याने शेती सर्वत्र हिरवळीने नटली आहे. शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही सुरू केल्याने आर्थिक उत्पन्नातही मोठी भर पडत असल्याचे मनोज वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने झाडांना मल्चिंग करून उन्हाळ्यात कमी पाण्यात झाडे कशी जोपासली जातील, याचे उद्दिष्ट या शेतकऱ्याने डोळ्यांसमोर ठेवले आहे. शेतीकामात आई-वडील, पत्नी, भाऊ यांचे सहकार्य लाभत आहे. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून मनोज वाघ यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे.