शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

गारपिटीवर मात करून एक एकरात जोपासली डाळिंबाची बाग

By admin | Updated: September 4, 2014 01:22 IST

गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे.

गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे. गतवर्षी दुष्काळ असतांना परिस्थितीवर मात करीत काळे यांनी मिळेल तेथून टँकरद्वारे पाणी आणून ठिबकची जोडणी करून बागेची जोपासना केली परंतु त्यानंतर गारपीटीने हाती आलेले उत्पन्न जाते की काय अशी भिती होती. या संकटाला खचून न जाता त्यावर मात करत चार वर्षांपासून अगदी पोटच्या मुलाप्रमाणे डाळींब झाडांचा सांभाळ केला. चार वर्षांमध्ये दोन वेळेला गारपिटीने नुकसान झाले. तरीही त्यांची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करीत जोपासना करीत कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक ज्ञानदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कुशलतेने डाळींब काढण्यात आली.चार वर्षांमध्ये जवळपास तीन लाख रूपये खर्च झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याच्या कमतरतेमुळे शेततळ्याची गरज असून त्यासाठी प्रस्ताव पाठविला,परंतू त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कृषी विभागाने मदत केल्यास काळेंचे अनुकरण दुसरे शेतकरी व जास्तीत जास्त फळबागा निर्माण होईल अशी आशा आहे. एका एकरमध्ये पाण्याची कमतरता असूनही डाळींबाची बाग फुलविण्यात आली असल्याने केवळ योग्य नियोजनामुळे आणि ठिबक सिंचन पध्दतीमुळे हे शक्य झाले असल्याचे शेतकरी शेनफड यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनाही या पध्दतीचा अवलंब करावा असे ते म्हणाले.