शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

कालबाह्य वाहनांच्या वापरामुळेच शहरात प्रदूषण

By admin | Updated: March 11, 2016 01:03 IST

जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे.

जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे. लोकमतने वाढत्या प्रदूषणाबाबत सर्व्हेक्षण करून नागरिकांची मत जाणून घेतले. यावेळी अनेकांनी या प्रश्नांसोबतच इतर प्रश्नही उपस्थित करून प्रदूषण मंडळावर बोट ठेवले. लोकमत सर्व्हेक्षणासाठी नागरिकांना पाच प्रश्न विचारण्यात आली. शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढले आहे का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक होय म्हणतात. ३० टक्के नागरिकांना हे चुकीचे वाटते तर १० टक्के नागरिकांना याची माहिती नसल्याने ते तटस्थ राहिले. कालबाह्य वाहनांच्या वापरामुळे प्रदूषण वाढते का यावर ८० टक्के नागरिक होय म्हणतात. ५ टक्के नाही म्हणतात तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. कालबाह्य वाहनांमुळेच प्रदूषण वाढत असल्याचे बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनचालकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ जागृती करते का? २० टक्के होय म्हणतात. ७५ टक्के नागरिक नाही म्हणतात. ५ टक्के नागरिकांचे काहीच म्हणणे नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वाढत्या प्रदूषणाकडे कानाडोळो हातोय का? यावर ५५ टक्के नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावरच खापर फोडले. ३० टक्के नाही म्हणतात. १५ टक्के नागरिकांना याबाबत माहीत नाही असे उत्तर दिले. पीयूसी करण्याबाबत वाहनचालक आग्रही आहेत का? ४५ टक्के नागरिक होय म्हणतात.५० टक्के नाही म्हणतात तर ५ टक्के माहीत नाही म्हणतात. एकूणच नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. लोकमतने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी मते नोंदवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिखट प्रतिक्रिया देत प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करावे, अशी मागणीही काहींनी व्यक्त केली. काही वाहनचालक रिक्षा, दुचाकी तसेच जीप व ट्रकमध्ये सर्रास रॉकेलचा वापर करतात. यामुळेही प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वाहने कालबाह्य झाल्यानंतरही थोडीबहुत दुरूस्ती करून धावतात.यामुळेही प्रदूषण वाढत आहे. शहरातील प्रदूषणासोबतच धुळीचा प्रश्नही गंभीर बनल असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. प्रदूषण व धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याचे काही वयोवृद्ध वाचकांनी सांगितले. (प्रतिनिधी)