शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

रोहित्रावरून ‘श्रेयवादा’चे राजकारण...!

By admin | Updated: December 29, 2016 22:53 IST

बीड रबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे.

राजेश खराडे बीडरबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे. आठ दिवसांपूर्वी विभागाकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाल्याने प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या रोहित्रांचा जिव्हाळ्याच्या प्रश्नात लोकप्रतिनिधींनी उडी घेतली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या ३-४ वर्षांपासून कृषी पंप बंद होते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्यामुळे कृषी पंपांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. दुरुस्तीसाठी दाखल केलेले रोहित्र मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणच्या दारी खेटे मारले आहेत. येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही रोहित्राच्या पूर्ततेसाठी इतर विभागांशी संपर्क साधून रोहित्रे मिळविली होती. त्यातच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जामंत्र्यांकडून बीड विभागाकरिता ४०० रोहित्र पूर्ततेचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाला असल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.अधिकाऱ्यांचे परिश्रम व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या रोहित्रांचे श्रेय आता लोकप्रतिनिधी लाटू पाहत आहेत. केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर हे राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे. रोहित्राचा प्रश्न बाजूला ठेवून केवळ माझ्यामुळे हे शक्य झाले, असा दावा हे लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत.रोहित्रे मिळविण्याकरिता वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या अरेरावीची भाषेला सामोरे जावे लागले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.